शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सडक योजनेने दुर्गम रस्त्यांना नवसंजीवनी

By admin | Updated: February 21, 2016 00:47 IST

पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सडक योजना २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे.

नियोजन पूर्ण : भामरागड, सिरोंचा, धानोरा व एटापल्ली तालुक्यांना प्राधान्यगडचिरोली : पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सडक योजना २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेतून आदिवासीबहुल भागातील २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे जोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा व सिरोंचा या तालुक्यांमधील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील रस्ते निर्मितीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान सडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाने नियोजन केले असून त्याला शासनाची मंजुरीही मिळाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा कालावधी उलटला असला तरी अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो गावे रस्त्याने जोडण्यात आली नाही. जी गावे रस्त्याने जोडण्यात आली आहेत, त्यांचीच डागडुजी करण्याचे काम शासनाकडून केले जात आहेत. दुर्गम व आदिवासीबहुल भागात रस्ते पोहोचले नसल्याने या भागाचा विकासही खुटला आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा व सिरोंचा हे चार तालुके आदिवासीबहुल आहेत. या तालुक्यांमधील बहुतांश गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. यातील काही गावांपर्यंत अजूनही रस्ते पोहोचले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजन करताना या तालुक्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन वर्षांच्या नियोजनामध्ये एटापल्ली तालुक्यात आठ रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. एकूण ३८ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. भामरागड तालुक्यात चार रस्ते मंजूर आहेत. यातून आठ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. धानोरा तालुक्यात सहा रस्ते मंजूर आहेत. १७.९० किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. सिरोंचा तालुक्यात २७ किमीचे चार रस्ते बांधले जाणार आहेत. या रस्त्यांमुळे १० पेक्षा अधिक गावे किमान आठमाही रस्त्याने जोडली जाणार आहेत. या रस्त्यांवरील पुलांचेही बांधकाम केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)