शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून तलावांना नवसंजीवनी

By admin | Updated: August 10, 2016 01:34 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीचे काम तसेच गाळ उपसण्याचे काम केले जात आहे.

जलयुक्त शिवार अभियान : १३ हजार घनमीटर गाळ उपसला गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीचे काम तसेच गाळ उपसण्याचे काम केले जात आहे. मागील वर्षी १०० पेक्षा अधिक तलावांमधील १२ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला. त्यामुळे या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला रोवणीपासून ते कापणीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ५०० पेक्षा अधिक मामा तलाव व बोड्या आहेत. काही बोड्या ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या आहेत. या बोड्यांमध्ये दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर गाळ साचल्याने या बोड्या उथळ झाल्या होत्या. परिणामी पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या पावसाच्या पाण्याने लवकरच भरत होत्या. पाणी सोडल्यानंतर लवकरच आटतही होत्या. परिणामी शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपत होते. २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी १५२ गावांची निवड करण्यात आली व यामध्ये प्राधान्याने तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. सरकारी कामाबरोबरच लोकसहभागातून तलाव व बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. गाळ उपसण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी स्वत:हून गाळ उपसण्यास सुरूवात केली. जिल्हाभरातील १०० हून अधिक तलाव व बोड्यांमधील १२ हजार ६०० घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. याचा फायदा यावर्षीच दिसून आला असून तलाव व बोड्यांमधील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. ८४४ शेततळे बांधले सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये पाऊस न झाल्यास सिंचनाअभावी धानाचे पीक करपण्याचा सर्वाधिक धोका राहतो. या कालावधीत शेतकऱ्यांकडे थोडीफार सिंचनाची सुविधा असल्यास त्याचे धानपीक वाचू शकते. त्यामुळे धान पिकाच्या शेतीत शेततळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेततळे बांधून देण्याची योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत जिल्हयात ८४४ शेततळे बांधण्यात आली आहेत. पहिल्यांदाच उपसला गाळ अनेक तलाव व बोड्या स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील आहेत. तर काही तलावांना ३० ते ४० वर्षांचा कालावधी झाला आहे. गाळ उपसण्यासाठी बराच खर्च येत असल्याने एवढ्या वर्षानंतरही गाळ उपसण्यात आला नव्हता. काही बोड्यांच्या पाळी फुटल्याने या दुरूस्तही करण्यात आल्या नव्हत्या. मात्र जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पहिल्यांदाच गाळ उपसण्यात आला आहे. शासकीय पैशाबरोबरच लोकांच्या सहभागातून हे महत्वपुर्ण काम घडले आहे. लोकसहभागातून अशा प्रकारची लोकोपयोगी कामे झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील नागरिक लोकसहभागासाठी सहज तयार होतात. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.