शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

वैनगंगेत होणार जलवाहतूक

By admin | Updated: April 2, 2015 01:48 IST

केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे.

गडचिरोली : केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे. यात भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा समावेश आहे. केंद्र सरकारने वैनगंगा नदीत जलवाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या नदीवर जलवाहतूक सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील प्रमुख नद्यांमध्ये जलवाहतुकीच्या दृष्टीने आराखडा तयार केला असून या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी देसाईगंज तालुक्यापासून आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यापर्यंत वाहते. पुढे ही नदी सिरोंचापर्यंत जाते. मात्र चपराळाजवळ ती वर्धा नदीला जाऊन मिळते. वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र गडचिरोली जिल्ह्यात जवळजवळ १०० हून अधिक किमी लांब आहे. या नदीला बारमाही पाणी राहू शकते. या नदीवर बंधारे बांधून पाणी रोखून धरल्यास या ठिकाणी जलपर्यंटन शक्य आहे. त्यामुळे यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. केंद्र सरकारने अलीकडेच देशातील जलपर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या नद्यांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये वैनगंगा नदीचे नावही समाविष्ट आहे. त्यामुळे जलपर्यटनाचा प्रयोग लवकरच जिल्ह्यात सुरू होईल, अशी आशा आता जिल्हावासीयांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)यापूर्वीच होता जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावगडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी वैनगंगा नदीत जलपर्यटन करण्याच्या दृष्टीने २००९-१० मध्ये प्रस्ताव तयार केला होता व तो राज्य सरकारकडे सादर केला होता. मात्र या प्रस्तावावर कोणताही विचार त्यावेळी झाला नाही. तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना मार्र्कं डा येथे नेऊन त्यांना जलपर्यटनाची माहितीही देण्यात आली होती. मार्र्कं डा महोत्सवाच्या निमित्ताने जलपर्यटनाची ही बाब समोर आली होती. मात्र तत्कालीन सरकारने याबाबत काहीही हालचाली न केल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडून होता. आता केंद्र सरकारने यावर विचार सुरू केला आहे.वैनगंगा नदीवर पाच बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे वैनगंगेचे पात्र पाण्याने भरून राहील. यावर जलवाहतूक सुरू करता येईल. जलवाहतुकीमुळे सर्वसामान्यांचा प्रवासाचा खर्चही वाचेल. कमी खर्चात प्रवास करता येईल. वैनगंगेचे २५० किमीवरून पाणी आंध्रात वाहून जात होते. त्यालाही पायबंद बसेल.- अशोक नेते, खासदार, गडचिरोलीगडकरींनी दिले होते निवडणुकीत आश्वासनवैनगंगा नदीत जलपर्यटन सुरू केले जाईल, असे आश्वासन गडचिरोली येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने वैनगंगा नदीची निवड केली आहे. या नदीपात्रात प्रत्येक १० किमी अंतरावर बसस्थानकाच्या धर्तीवर थांबे तयार केले जातील. तेथून प्रवाशांना घेऊन जलपर्यटन करून दिले जाईल. यातून रोजगार निर्मितीसुद्धा होईल, असा दावा ना. गडकरी यांनी केला होता. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी आणखी तीन ते चार वर्ष या कामासाठी लागतील काय, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.