शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

वैनगंगेत होणार जलवाहतूक

By admin | Updated: April 2, 2015 01:48 IST

केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे.

गडचिरोली : केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे. यात भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा समावेश आहे. केंद्र सरकारने वैनगंगा नदीत जलवाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या नदीवर जलवाहतूक सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील प्रमुख नद्यांमध्ये जलवाहतुकीच्या दृष्टीने आराखडा तयार केला असून या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी देसाईगंज तालुक्यापासून आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यापर्यंत वाहते. पुढे ही नदी सिरोंचापर्यंत जाते. मात्र चपराळाजवळ ती वर्धा नदीला जाऊन मिळते. वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र गडचिरोली जिल्ह्यात जवळजवळ १०० हून अधिक किमी लांब आहे. या नदीला बारमाही पाणी राहू शकते. या नदीवर बंधारे बांधून पाणी रोखून धरल्यास या ठिकाणी जलपर्यंटन शक्य आहे. त्यामुळे यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. केंद्र सरकारने अलीकडेच देशातील जलपर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या नद्यांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये वैनगंगा नदीचे नावही समाविष्ट आहे. त्यामुळे जलपर्यटनाचा प्रयोग लवकरच जिल्ह्यात सुरू होईल, अशी आशा आता जिल्हावासीयांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)यापूर्वीच होता जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावगडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी वैनगंगा नदीत जलपर्यटन करण्याच्या दृष्टीने २००९-१० मध्ये प्रस्ताव तयार केला होता व तो राज्य सरकारकडे सादर केला होता. मात्र या प्रस्तावावर कोणताही विचार त्यावेळी झाला नाही. तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना मार्र्कं डा येथे नेऊन त्यांना जलपर्यटनाची माहितीही देण्यात आली होती. मार्र्कं डा महोत्सवाच्या निमित्ताने जलपर्यटनाची ही बाब समोर आली होती. मात्र तत्कालीन सरकारने याबाबत काहीही हालचाली न केल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडून होता. आता केंद्र सरकारने यावर विचार सुरू केला आहे.वैनगंगा नदीवर पाच बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे वैनगंगेचे पात्र पाण्याने भरून राहील. यावर जलवाहतूक सुरू करता येईल. जलवाहतुकीमुळे सर्वसामान्यांचा प्रवासाचा खर्चही वाचेल. कमी खर्चात प्रवास करता येईल. वैनगंगेचे २५० किमीवरून पाणी आंध्रात वाहून जात होते. त्यालाही पायबंद बसेल.- अशोक नेते, खासदार, गडचिरोलीगडकरींनी दिले होते निवडणुकीत आश्वासनवैनगंगा नदीत जलपर्यटन सुरू केले जाईल, असे आश्वासन गडचिरोली येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने वैनगंगा नदीची निवड केली आहे. या नदीपात्रात प्रत्येक १० किमी अंतरावर बसस्थानकाच्या धर्तीवर थांबे तयार केले जातील. तेथून प्रवाशांना घेऊन जलपर्यटन करून दिले जाईल. यातून रोजगार निर्मितीसुद्धा होईल, असा दावा ना. गडकरी यांनी केला होता. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी आणखी तीन ते चार वर्ष या कामासाठी लागतील काय, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.