शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दीपक सिंगला : जिल्ह्यात ६६ हजार कुटुंबातील २ लाख ३७ हजार जणांची तपासणी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी तसेच स्वत:हून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे. कोरोनाबाबत शासनाकडून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले. तसेच आॅक्सिजन पातळी आवश्यक ९५ पेक्षा जास्त नसलेले ९११ नागरिक आढळून आले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून ५०६ जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे.संदर्भित केलेल्या ५०६ व्यक्तींपैकी शनिवारपर्यंत कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ जणांपैकी ३ जण कोरोनाबाधित आढळले. उर्वरीत जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे येत्या कालावधीत होणार आहे.कित्येक नागरिकांना स्वत:ला असलेल्या जुन्या आजारांबद्दल माहिती नसते. अशावेळी कोरोना संसर्ग धोकादायक ठरू शकतो. कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. या संसर्गावर जरी औषध नसले तरी वेळेत दवाखान्यात दाखल करून संसर्गाची वाढ रोखण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीची औषधे, तसेच इतर आजारांवरील उपचार तातडीने देता येतो आणि त्या ठिकाणी आॅक्सिजन व्यवस्था असते त्याचाही वापर आवश्यकतेनुसार करण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० हून अधिक जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यात कोरोना लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला जरी इतर आजार असला आणि वेळेत उपचार केले तर कोरोनावर मात करणे शक्य असते. आतापर्यंत बहूतेक जण उशीरा दवाखान्यात दाखल झाल्यानेच मृत्यू झाल्याच्या नोंदी जास्त वाढतात असे सर्वदूर आहे. वेळेत उपचार सेवा देण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम महत्वाची आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे.पाच मिनिटात तपासणी होते पूर्णया मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, आॅक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, आॅक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-१९ च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त ५ मिनीटात तपासणी पूर्ण होते.अशी घ्या काळजीनागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या