शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दीपक सिंगला : जिल्ह्यात ६६ हजार कुटुंबातील २ लाख ३७ हजार जणांची तपासणी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी तसेच स्वत:हून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे. कोरोनाबाबत शासनाकडून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले. तसेच आॅक्सिजन पातळी आवश्यक ९५ पेक्षा जास्त नसलेले ९११ नागरिक आढळून आले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून ५०६ जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे.संदर्भित केलेल्या ५०६ व्यक्तींपैकी शनिवारपर्यंत कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ जणांपैकी ३ जण कोरोनाबाधित आढळले. उर्वरीत जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे येत्या कालावधीत होणार आहे.कित्येक नागरिकांना स्वत:ला असलेल्या जुन्या आजारांबद्दल माहिती नसते. अशावेळी कोरोना संसर्ग धोकादायक ठरू शकतो. कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. या संसर्गावर जरी औषध नसले तरी वेळेत दवाखान्यात दाखल करून संसर्गाची वाढ रोखण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीची औषधे, तसेच इतर आजारांवरील उपचार तातडीने देता येतो आणि त्या ठिकाणी आॅक्सिजन व्यवस्था असते त्याचाही वापर आवश्यकतेनुसार करण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० हून अधिक जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यात कोरोना लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला जरी इतर आजार असला आणि वेळेत उपचार केले तर कोरोनावर मात करणे शक्य असते. आतापर्यंत बहूतेक जण उशीरा दवाखान्यात दाखल झाल्यानेच मृत्यू झाल्याच्या नोंदी जास्त वाढतात असे सर्वदूर आहे. वेळेत उपचार सेवा देण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम महत्वाची आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे.पाच मिनिटात तपासणी होते पूर्णया मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, आॅक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, आॅक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-१९ च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त ५ मिनीटात तपासणी पूर्ण होते.अशी घ्या काळजीनागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या