शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दीपक सिंगला : जिल्ह्यात ६६ हजार कुटुंबातील २ लाख ३७ हजार जणांची तपासणी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाला लढा देण्यासाठी तसेच स्वत:हून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे. कोरोनाबाबत शासनाकडून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ३७ हजार ९८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी सारी व आयएलआयचे ४०६ व्यक्ती मिळाले. तसेच आॅक्सिजन पातळी आवश्यक ९५ पेक्षा जास्त नसलेले ९११ नागरिक आढळून आले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून ५०६ जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे.संदर्भित केलेल्या ५०६ व्यक्तींपैकी शनिवारपर्यंत कोविड तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ जणांपैकी ३ जण कोरोनाबाधित आढळले. उर्वरीत जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे येत्या कालावधीत होणार आहे.कित्येक नागरिकांना स्वत:ला असलेल्या जुन्या आजारांबद्दल माहिती नसते. अशावेळी कोरोना संसर्ग धोकादायक ठरू शकतो. कोरोना संसर्ग झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. या संसर्गावर जरी औषध नसले तरी वेळेत दवाखान्यात दाखल करून संसर्गाची वाढ रोखण्यासाठी प्रतिकारकशक्ती वाढण्यासाठीची औषधे, तसेच इतर आजारांवरील उपचार तातडीने देता येतो आणि त्या ठिकाणी आॅक्सिजन व्यवस्था असते त्याचाही वापर आवश्यकतेनुसार करण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० हून अधिक जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यात कोरोना लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला जरी इतर आजार असला आणि वेळेत उपचार केले तर कोरोनावर मात करणे शक्य असते. आतापर्यंत बहूतेक जण उशीरा दवाखान्यात दाखल झाल्यानेच मृत्यू झाल्याच्या नोंदी जास्त वाढतात असे सर्वदूर आहे. वेळेत उपचार सेवा देण्यासाठी व मृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम महत्वाची आहे, असे जिल्हाधिकारी सिंगला यांनी म्हटले आहे.पाच मिनिटात तपासणी होते पूर्णया मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, आॅक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, आॅक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-१९ च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त ५ मिनीटात तपासणी पूर्ण होते.अशी घ्या काळजीनागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या