शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:43 IST

जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देतालुकावासीयांना मनस्ताप : जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. एवढेच नाही तर इंद्रावती व प्राणहीता नदीवरील पुलाचे काम १८ वर्षानंतरही पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्यातील जनतेला प्रवास करणे सोईस्कर व्हावे म्हणऊन केंद्र शासनाने तेंलगणा राज्यातील निजामबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूर असा राष्ट्रीय महामार्ग बनविला. त्यातील ५६ किलोमीटरचा रस्ता सिरोंचा तालुक्यातून जातो. या मार्गासाठी कोटयवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग सुस्थितीत नाही.याशिवाय सिरोंचा ते असरअल्ली यादरम्यान महामार्गाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. जिकडे-तिकडे गिट्टी उखडून खड्डे पडले आहेत. १९९८-९९ मध्ये सीमा रस्ता संघटना -(बी.आर.ओ.)च्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू करण्यात आले. सिरोंचा येथे कार्यालय देखील बांधण्यात आले. सिरोंचा येथून पातागुड़म असा ६५ कि.मी. अंतराचा या राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला होता. या महामार्गात महाराष्ट्र तेलंगना यांना जोड़णारा प्राणहिता नदीवरील पूल व महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा पातागुड़म गावाजवळील इंद्रावती नदीवरील पूल होता. या पुलांचे काम अंतिम टप्प्यावर असले तरी कासवगतीने चालत आहे.याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकड़े तक्रारी देण्यात आल्या तरी ड़ोळेझाकपणा केला जात आहे. सिरोंचा ते असरअल्ली हा ३२ कि.मी.पर्यतचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागतो. ग्रामीण मार्गापेक्षाही या मार्गाची स्थिती बिकट झाली आहे. शासनाने त्वरित या राष्ट्रीय महामार्गाकड़े लक्ष देऊन दुरूस्ती करावी अशी मागणी तालुकावासियांकडून केली जात आहे

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग