शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नागरिकांच्या मुलाखतींवरून ठरणार राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:28 IST

स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत.

ठळक मुद्दे १ ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यात सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या विचारांना १०० पैकी सुमारे ३५ टक्के गुण देण्यात आले आहेत.देशभरातील ९८ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. या गावांमध्ये शाश्वत स्वच्छता राहावी, यासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ग्रामपंचायतीचे गुणांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत त्रयस्त संस्थेच्या वतीने गुणांकन होणार आहे. एकूण १०० गुण आहेत. यामध्ये स्वच्छतेबाबतच्या सोयीसुविधांसाठी ३० गुण राहतील. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती, नागरिकांचे अभिप्राय, प्रभावी व्यक्तीचे अभिप्राय यांना ३५ गुण राहणार आहेत. तर स्वच्छतेसंबंधी जिल्ह्याने व संबंधित राज्याने केलेली प्रगती यावर ३५ गुण राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतीची सर्वेक्षणासाठी नमुना पध्दतीने निवड केली जाणार आहे. त्या गावांना सर्वेक्षणकर्ते भेटी देऊन सोयीसुविधांची पाहणी व नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. सर्वेक्षणासाठी कोणत्या गावांची निवड होणार आहे, याबाबतची माहिती अतिशय गोपनिय ठेवली जात आहे. गावांची नावे सर्वेक्षणकर्त्यांना दिल्ली येथून त्याच दिवशी अगदी वेळेवर कळविले जात आहेत. यामुळे सर्वेक्षणात पारदर्शकता राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर टीम सोमवारी दाखल झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान