शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

नागरिकांच्या मुलाखतींवरून ठरणार राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:28 IST

स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत.

ठळक मुद्दे १ ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यात सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या विचारांना १०० पैकी सुमारे ३५ टक्के गुण देण्यात आले आहेत.देशभरातील ९८ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. या गावांमध्ये शाश्वत स्वच्छता राहावी, यासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ग्रामपंचायतीचे गुणांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत त्रयस्त संस्थेच्या वतीने गुणांकन होणार आहे. एकूण १०० गुण आहेत. यामध्ये स्वच्छतेबाबतच्या सोयीसुविधांसाठी ३० गुण राहतील. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती, नागरिकांचे अभिप्राय, प्रभावी व्यक्तीचे अभिप्राय यांना ३५ गुण राहणार आहेत. तर स्वच्छतेसंबंधी जिल्ह्याने व संबंधित राज्याने केलेली प्रगती यावर ३५ गुण राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतीची सर्वेक्षणासाठी नमुना पध्दतीने निवड केली जाणार आहे. त्या गावांना सर्वेक्षणकर्ते भेटी देऊन सोयीसुविधांची पाहणी व नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. सर्वेक्षणासाठी कोणत्या गावांची निवड होणार आहे, याबाबतची माहिती अतिशय गोपनिय ठेवली जात आहे. गावांची नावे सर्वेक्षणकर्त्यांना दिल्ली येथून त्याच दिवशी अगदी वेळेवर कळविले जात आहेत. यामुळे सर्वेक्षणात पारदर्शकता राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर टीम सोमवारी दाखल झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान