शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायती रखडल्या

By admin | Updated: November 26, 2014 23:07 IST

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात

गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आठ गावांमध्ये नगर पंचायती निर्माण होणार होत्या. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचे काम रखडलेले आहे.काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने राज्यातील मोठ्या गावांमधील तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला जाणार होता. याबाबत अधिसूचना जारी करून नागरिकांकडून हरकतीही मागण्यात आल्या होत्या. मात्र वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही नगर पंचायतीच्या स्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरली आहे. आरमोरी व चामोर्शीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात मागील नागपूर अधिवेशनात उपोषणही करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने नगर पंचायती निर्माण करण्याचे पिल्लू सोडून नवीन नगर पालिका निर्माण करण्याचे कामही प्रलंबित ठेवले आहे. नगर पंचायती निर्माण झाल्यास संबंधीत ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीमध्ये वाढ होईल व या गावांच्या विकासावर चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करता येईल, अशी राज्य सरकारची भूमिका होती. परंतु या प्रश्नावर पुढे कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. अलिकडेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रमही काही भागात राज्य सरकारने घोषित केला. त्यामुळे सरकार आता नव्याने या निर्णयावर अंमलबजावणी करते की काय, अशी शक्यता आहे. राज्यात सत्तांतरण होऊन भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. आघाडी सरकार असतांना आरमोरीला नगर पालिकेचा दर्जा द्यावा म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे उपोषण केले होते. आता त्यांनी राज्य सरकारवर दबाव ठेवून आरमोरी व चामोर्शी या दोनही ग्रामपंचायतींचे नगर पालिकेत रूपांतर करावे, अशी मागणी जनतेने केली आहे. २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात ही नगर पंचायत स्थापन होईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुका मुख्यालय नगर पंचायतसाठी पात्र ठरतील, असे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनीही जाहीर केले होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)