शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

जिल्ह्यात नगर पंचायती रखडल्या

By admin | Updated: February 5, 2015 23:09 IST

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा

गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती निर्माण करण्यात येणार होत्या. मात्र याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून न झाल्याने नगर पंचायतीचे काम आता थंडबस्त्यात पडले आहे. राज्य सरकारने २५ हजार ते ४८ हजार लोकसंख्या असलेल्या गावात नगर पंचायती स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांपैकी गडचिरोली व देसाईगंज येथे नगर पालिका आहेत. त्यामुळे १० तालुका मुख्यालयात नगर पंचायतीची स्थापना करण्यात येणार होती. यामध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायती नगर पंचायतीचा दर्जा देण्यात येणार होता. याबाबत शासन आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हरकतीसुध्दा नागरिकांकडून मागविले होते. अनेकांनी आरमोरी व चामोर्शी ग्रामपंचायतीला नगर पालिकेचाच दर्जा द्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर हा मुद्दा आता थंडबस्त्यात पडला आहे. शासनाकडून या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर, नागपूर जिल्ह्यात कन्हान, वाडी या ग्रामपंचायती भागांना नगर पालिकांचा दर्जा देऊन तेथे नव्याने निवडणुकाही घेण्यात आल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात मे महिन्यात २९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी शासनाने नगर पंचायत निर्मितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब न केल्यास तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नंतर दर्जा देण्यास अडचणी निर्माण होणार आहे. नगर पंचायत झाल्यास या भागाच्या तालुका मुख्यालयाच्या विकासाला चालना मिळेल, अशी या निर्णयामागची भावना होती. मात्र शासनाने हा निर्णय थंडबस्त्यात ठेवला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)