शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

जिल्ह्यात नगर पंचायती रखडल्या

By admin | Updated: February 5, 2015 23:09 IST

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा

गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती निर्माण करण्यात येणार होत्या. मात्र याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून न झाल्याने नगर पंचायतीचे काम आता थंडबस्त्यात पडले आहे. राज्य सरकारने २५ हजार ते ४८ हजार लोकसंख्या असलेल्या गावात नगर पंचायती स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांपैकी गडचिरोली व देसाईगंज येथे नगर पालिका आहेत. त्यामुळे १० तालुका मुख्यालयात नगर पंचायतीची स्थापना करण्यात येणार होती. यामध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायती नगर पंचायतीचा दर्जा देण्यात येणार होता. याबाबत शासन आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हरकतीसुध्दा नागरिकांकडून मागविले होते. अनेकांनी आरमोरी व चामोर्शी ग्रामपंचायतीला नगर पालिकेचाच दर्जा द्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर हा मुद्दा आता थंडबस्त्यात पडला आहे. शासनाकडून या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर, नागपूर जिल्ह्यात कन्हान, वाडी या ग्रामपंचायती भागांना नगर पालिकांचा दर्जा देऊन तेथे नव्याने निवडणुकाही घेण्यात आल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात मे महिन्यात २९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी शासनाने नगर पंचायत निर्मितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब न केल्यास तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नंतर दर्जा देण्यास अडचणी निर्माण होणार आहे. नगर पंचायत झाल्यास या भागाच्या तालुका मुख्यालयाच्या विकासाला चालना मिळेल, अशी या निर्णयामागची भावना होती. मात्र शासनाने हा निर्णय थंडबस्त्यात ठेवला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)