शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मुके, बहिरेपणाला साद घालावी कुणी?

By admin | Updated: June 20, 2017 00:43 IST

घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल,..

योजनांचा लाभ नाही : देलनवाडीच्या बावणे कुटुंबीयांचे जीवन खडतरप्रदीप बोडणे । लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. संघर्षमय प्रवास असलेली, अशा प्रकारची करूण कहाणी देलनवाडी येथील बावणे कुटुंबाची आहे. ताराबाई बावणे या कर्णबधीर आहेत तर त्यांची मुलगी पिंकी ही मतीमंद व मुकी आहे. दहा वर्षापूर्वी नकटू बावणे यांचा मृत्यू झाला आणि बावणे कुटुंबाचा आधारवड हरपला. मतीमंद व बधीर मुलीच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी कर्णबधीर असलेल्या ताराबाई बावणे यांच्यावर आली. मुके व बहिरेपणात मायलेकीच्या दारिद्र्याचा अंधार अधिकच गडद झाला. मतीमंद व मुक्या मुलीच्या जगण्याचा संघर्ष ताराबाईच्या जीवनात अद्यापही कायम आहे. राहण्यासाठी स्वत:चे घरही नाही. सचिन मेश्राम याने आपले जुने घर या मायलेकींना राहण्यासाठी दिले आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. मात्र मुक्या, बहिरेपणात खडतर जीवन जगणाऱ्या ताराबाई बावणे व त्यांची मुलगी पिंकी हिला अद्यापही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना प्रतिमहिना ६०० रूपयांचा लाभ दिला जातो. मात्र सदर मायलेकींना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या बावणे कुटुंबीयाकडे अद्यापही शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. देवाधर्माच्या नावावर लाखो रूपयांची उधळपट्टी करून उत्सव साजरा करणाऱ्या एकाही तथाकथीत सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही. मुके, बहिरेपणात जीवन जगणाऱ्या मायलेकीच्या आयुष्यात सहकार्य करण्यासाठी सामाजिक दातृत्व कर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. या मायलेकींना मदतीचा हात दिल्यास त्यांचे जीवन थोडेफार सुकर होईल.