शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:13 IST

आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देठिकठिकाणी मोठमोठे खड्डे : जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निद्रावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.मुस्का परिसरातील तळेगाव, खांबाडा, भाकरोंडी, नवेगाव, बांधोना, सालेभट्टी, नवतळा, निमगाव आदी गावातील शेकडो नागरिक दररोज याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर निघाली आहे. खांबाडा-मुस्कापासून ते वाहनधारक व प्रवाशी भाकरोंडी येथे विविध कामासाठी येतात. येथून धानोरा, गडचिरोली तर काही प्रवाशी आरमोरी, कुरखेडाकडे प्रयाण करतात. विद्यालय, महाविद्यालय, शिक्षण, पोलीस ठाणे व तालुकास्तरावरील इतर कामांसाठी याच मार्गाने या भागातील नागरिक आरमोरी तालुका मुख्यालयाकडे जातात. थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाने नागरिक आवागमन करतात. त्यामुळे या भागातील सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर चालणारी अनेक चारचाकी वाहने भंगार झाली आहेत. दुचाकी वाहनांनाही बºयाचदा अपघात घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम विभागामार्फत पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी देलनवाडी, मानापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील अनेक मार्गांची दुरवस्थाआरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शिक्षणाच्या विविध सोयी आहेत. शिवाय चांगल्या प्रकारची बाजारपेठ आहे. विविध शासकीय कार्यालय असल्याने योजनांच्या लाभासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज आरमोरी तालुका मुख्यालयी येतात. मात्र तालुकास्थळी येण्यासाठी असलेल्या बहुतांश मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था वाईट आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक प्रवास करीत आहेत. बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वॉर्डावॉर्डातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन कामे मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.