शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:13 IST

आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देठिकठिकाणी मोठमोठे खड्डे : जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निद्रावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.मुस्का परिसरातील तळेगाव, खांबाडा, भाकरोंडी, नवेगाव, बांधोना, सालेभट्टी, नवतळा, निमगाव आदी गावातील शेकडो नागरिक दररोज याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर निघाली आहे. खांबाडा-मुस्कापासून ते वाहनधारक व प्रवाशी भाकरोंडी येथे विविध कामासाठी येतात. येथून धानोरा, गडचिरोली तर काही प्रवाशी आरमोरी, कुरखेडाकडे प्रयाण करतात. विद्यालय, महाविद्यालय, शिक्षण, पोलीस ठाणे व तालुकास्तरावरील इतर कामांसाठी याच मार्गाने या भागातील नागरिक आरमोरी तालुका मुख्यालयाकडे जातात. थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाने नागरिक आवागमन करतात. त्यामुळे या भागातील सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर चालणारी अनेक चारचाकी वाहने भंगार झाली आहेत. दुचाकी वाहनांनाही बºयाचदा अपघात घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम विभागामार्फत पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी देलनवाडी, मानापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील अनेक मार्गांची दुरवस्थाआरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शिक्षणाच्या विविध सोयी आहेत. शिवाय चांगल्या प्रकारची बाजारपेठ आहे. विविध शासकीय कार्यालय असल्याने योजनांच्या लाभासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज आरमोरी तालुका मुख्यालयी येतात. मात्र तालुकास्थळी येण्यासाठी असलेल्या बहुतांश मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था वाईट आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक प्रवास करीत आहेत. बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वॉर्डावॉर्डातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन कामे मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.