शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:13 IST

आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देठिकठिकाणी मोठमोठे खड्डे : जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निद्रावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.मुस्का परिसरातील तळेगाव, खांबाडा, भाकरोंडी, नवेगाव, बांधोना, सालेभट्टी, नवतळा, निमगाव आदी गावातील शेकडो नागरिक दररोज याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मुस्का-भाकरोंडी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर निघाली आहे. खांबाडा-मुस्कापासून ते वाहनधारक व प्रवाशी भाकरोंडी येथे विविध कामासाठी येतात. येथून धानोरा, गडचिरोली तर काही प्रवाशी आरमोरी, कुरखेडाकडे प्रयाण करतात. विद्यालय, महाविद्यालय, शिक्षण, पोलीस ठाणे व तालुकास्तरावरील इतर कामांसाठी याच मार्गाने या भागातील नागरिक आरमोरी तालुका मुख्यालयाकडे जातात. थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाने नागरिक आवागमन करतात. त्यामुळे या भागातील सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर चालणारी अनेक चारचाकी वाहने भंगार झाली आहेत. दुचाकी वाहनांनाही बºयाचदा अपघात घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम विभागामार्फत पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी देलनवाडी, मानापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील अनेक मार्गांची दुरवस्थाआरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शिक्षणाच्या विविध सोयी आहेत. शिवाय चांगल्या प्रकारची बाजारपेठ आहे. विविध शासकीय कार्यालय असल्याने योजनांच्या लाभासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज आरमोरी तालुका मुख्यालयी येतात. मात्र तालुकास्थळी येण्यासाठी असलेल्या बहुतांश मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था वाईट आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक प्रवास करीत आहेत. बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वॉर्डावॉर्डातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन कामे मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.