शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत जावयाची मेहुण्यांकडूनच हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:08 IST

बहीण आणि जावयात भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस जावईच कारणीभूत आहे, नव्हे जावयानेच तिला मारले असावे या संशयातून .....

ठळक मुद्देसिरोंचातील घटना : दोन चिमुकल्यांवरील आई-वडिलांचे छत्र गेले

ऑनलाईन लोकमतसिरोंचा : बहीण आणि जावयात भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस जावईच कारणीभूत आहे, नव्हे जावयानेच तिला मारले असावे या संशयातून दोन साळयांनी चाकूने भोसकून जावयाचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात घडली.राजन्ना नामला (३२) रा. चिंतनवेल्ला असे मृत इसमाचे नाव आहे. त्याच्याशी संध्याराणी (२५) हिचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही झाली. पण दोघांत नेहमी खटके उडत असत. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाल्यानंतर संध्याराणी हिने घरातील कीटकनाशक प्राषण केले. तिच्यावर आसरअली येथे प्राथमिक उपचार करून रात्री सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले, पण तिथे तिचा मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी शवपरिक्षण सुरू असताना संध्याराणीचे दोन भाऊ आणि माहेरच्या काही लोकांची जावई राजन्नासोबत रुग्णालयाच्या गेटवरच बाचाबाची झाली. यावेळी राग अनावर झालेल्या माहेरच्या लोकांनी राजन्नाला जबर मारहाण केली तर संतोष (३०) व रमेश लखमय्या सोदारी (२८) या भावंडांनी चाकुने भोसकले. यात राजन्नाचा जागीच मृत्यू झाला. बाहिणीच्या मृत्युला जावई राजन्नाच कारणीभूत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली देऊन दोन्ही भावांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे राजन्ना व संध्याराणी यांच्या दोन्ही मुलांवरील आईवडिलांचे छत्र हिरावल्या गेले. आई-वडिलही नाही आणि दोन्ही मामा कारागृहात पोहोचल्याने त्यांची वाताहात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Murderखून