शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविले

By admin | Updated: June 10, 2016 01:27 IST

प्रचंड पर्जन्यमानाने पावसाळ्यात गोकुलनगरलगतच्या शहरातील एकमेव तलावात मोठा पाणी साठा जमा होतो.

पावसाळ्यापूर्वीची खबरदारी : तलावाच्या मुख्य सांडव्याच्या परिसरात कारवाईगडचिरोली : प्रचंड पर्जन्यमानाने पावसाळ्यात गोकुलनगरलगतच्या शहरातील एकमेव तलावात मोठा पाणी साठा जमा होतो. या तलावातील अतिरिक्त पाणी मुख्य सांडव्यातून सुरळीतपणे शहराबाहेर जावे, जेणे करून पावसाळ्यात लगतच्या घरांमध्ये पाणी शिरणार नाही, या दृष्टीने गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने गुरूवारी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने गोकुलनगर परिसरातील अतिक्रमण काढले.स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार पावसाळ्यात शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी सूचविल्या आहेत. गोकुलनगर तलावाच्या मुख्य सांडव्याच्या तोंडावर तसेच परिसरात अनेक नागरिकांनी सिमेंटचे खांब उभारून तारेचे कुंपन करून अतिक्रमण केले होते तर काहींनी तणीस तसेच इंधनासाठी जळाऊ लाकडेही अतिक्रमित जागेवर ठेवली होती. तलावाच्या मुख्य सांडव्याच्या परिसरात अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात तलावातील अतिरिक्त पाणी शहराबाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. या समस्येची दखल घेऊन गडचिरोली पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी या भागातील अतिक्रमण काढण्याचे सक्त निर्देश पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिले. त्यानुसार पालिकेचे अभियंता एस. ए. पुनवटकर, शाखा अभियंता जी. टी. मैंद तसेच आरोग्य निरीक्षक डी. डी. संतोषवार यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तलावाच्या सांडव्याच्या परिसरातील अतिक्रमण काढले.या परिसरात जेसीबीने नाली खोदून सांडव्याद्वारे पावसाळ्यात तलावातील अतिरिक्त पाणी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा केला. यामुळे पावसाळ्यात आपत्ती निर्माण होणार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)