शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
3
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
5
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
6
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
7
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
8
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
9
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
10
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
11
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
12
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
13
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
14
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
15
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
16
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
17
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
18
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
19
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
20
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईची लोकल सुरू, मग गडचिरोलीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या. काेराेनाचा प्रभाव ओसरताच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, देसाईगंजच्या वडसा रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. एवढेच नाही तर या स्टेशनवरून धावणाऱ्या कोणत्याही सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू केला नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करीत रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे जिल्हाभरातील व नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील नागरिक देसाईगंज येथूनच रेल्वेने पुढचा प्रवास करतात. वडसा-चांदाफाेर्ट, गाेंदिया- बल्लारशा, वडसा- नागभिड, चांदाफाेर्ट-गाेंदिया, बल्लारशा-गाेंदिया या रेल्वे देसाईगंज स्थानकावरून जातात. देसाईगंज रेल्वेस्थानकावरून दरदिवशी जवळपास १५०० प्रवासी ये-जा करतात. त्यात जवळपास ४०० पासधारक आहेत. दिवसाला जवळपास ४० हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला उपलब्ध हाेत हाेते. याच मार्गावरून जसवंतपूर-काेरबा, सिकंदराबाद-दरभंगा या सुपरफास्ट रेल्वेही देसाईगंज रेल्वेस्थानकावर थांबत हाेत्या. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर या सर्व सुपरफास्ट रेल्वे धावत आहेत. मात्र, देसाईगंज रेल्वेस्थानकावरील थांबा बंद करण्यात आला आहे. गया-चेन्नई ही रेल्वे नव्याने सुरू झाली आहे. दररविवारी ही रेल्वे देसाईगंजवरून जाते. मात्र, तिचाही थांबा ठेवण्यात आला नाही. काेराेनापूर्व काळापर्यंत या सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेसचे थांबे देसाईगंज येथे असल्याने या ठिकाणावरून अनेक प्रवासी प्रवास करीत हाेते; परंतु आता थांबे रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

सर्व सुरू झाले असताना पॅसेंजरच का बंद

लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताना सर्व बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, उद्याेग, शहरी भागातील रेल्वे वाहतूक, बसगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे रेल्वेचे नुकसान हाेत आहे. साेबतच प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पॅसेंजर सुरू करण्यात यावी, तसेच पूर्वीप्रमाणेच सुपरफास्ट गाड्यांचे बसथांबे देसाईगंज येथे देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.

काेट

काेराेनाच्या पार्श्वभूमीवरच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले असावेत. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत काेणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही सूचना नाहीत.

- संजीवकुमार, स्टेशन प्रमुख