शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

महावितरणने केली ८.५ लाखांची वसुली

By admin | Updated: January 1, 2016 02:13 IST

थकीत वीज बिलाविरोधात महावितरणतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्षभरापासून वीज थकविलेल्या २९२

गडचिरोली : थकीत वीज बिलाविरोधात महावितरणतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्षभरापासून वीज थकविलेल्या २९२ वीज ग्राहकांकडून ८ लाख ८० हजार रूपये वसूल केले आहेत. त्याचबरोबर ज्या ग्राहकांकडे जास्त महिन्याचे वीज बिल थकीत राहिल त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीमही हाती घेतली जाणार आहे. प्रत्येक कामासाठी विजेचा वापर होत असल्याने वीज ही अत्यावश्यक गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात विजेचे दोन लाखांहून अधिक ग्राहक आहेत. वीज बिल थकीत राहत असल्याने वीज कंपनी आर्थिक अडचणीत येत असल्याचे लक्षात घेऊन मागील चार वर्षांपासून महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. मात्र काही ग्राहक या धोरणालाही फाटा देत १० ते १२ महिने उलटूनही वीज बिलाचा भरणा करीत नसल्याचे दिसून आले. वीज कंपनीने प्रत्येक जिल्हा कार्यालयाला याबाबत सक्त वसुलीचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली विभागातील १९२ व गडचिरोली विभागातील वीज ग्राहकांनी मागील वर्षभरापासून वीज बिलाचा भरणाच केला नव्हता. आलापल्ली विभागातील या वीज ग्राहकांकडे ३ लाख ८० हजार व गडचिरोली विभागातील ग्राहकांकडे ५ लाख रूपये थकीत पडले होते. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ग्राहकांकडून थकीत बिलाची रक्कम वसूल केली आहे. वीज विभागाच्या या कडक धोरणामुळे थकीत वीज बिल ठेवणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. या धोरणामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)नवीन वर्षापासून वीज बिल भरा, अन्यथा अंधारात रहा!४वीज बिल थकीत ठेवणाऱ्या ग्राहकांविरोधात वीज वितरण कंपनीने नवीन वर्षांपासून आक्रमक धोरण अवलंबिले आहे. जे वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करणार नाही, त्या ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी मान्य न करता सरळ वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जाईल. मात्र जे ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करतात, अशा ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.