शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सुरजागड लोहखाणीचे सुरक्षा भाडे माफ करण्यासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या पहाडावर असलेल्या लोहखाणीची लीज लॉयड्स मेटल्सला मिळाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या कंपनीने लोहदगड काढणे सुरू केले होते; ...

एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या पहाडावर असलेल्या लोहखाणीची लीज लॉयड्स मेटल्सला मिळाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या कंपनीने लोहदगड काढणे सुरू केले होते; पण तो सर्व कच्चा माल या कंपनीच्या घुग्गुस येथील कारखान्यात जात होता. सुरजागड पहाडी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्यामुळे आणि नक्षलवाद्यांचा या कामाला तीव्र विरोध असल्याने सदर कंपनीने पोलीस विभागाकडे संरक्षण मागितले होते. सुरजागड पहाडीच नाही तर लोहदगडांची खेप घुग्गुसकडे जातानाही पूर्णपणे पोलीस संरक्षण दिले जात होते. सदर कंपनी खासगी असल्याने गृह विभागाच्या नियमानुसार जेवढे दिवस सुरक्षा पुरविली तेवढ्या दिवसाचे भाडे पोलीस विभागाकडे जमा करणे अपेक्षित होते; परंतु कंपनीने पोलीस विभागालाच चकमा देत ताटकळत ठेवले आहे. कंपनीकडे पोलिसांच्या भाड्यापोटी तब्बल ४५ कोटी रुपये थकीत असल्याचे समजते.

गेल्या दोन वर्षांपासून सुरजागड खाणीचे काम ठप्प असताना आता ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी पुन्हा विरोध सुरू केल्यामुळे कंपनीला आणखी पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली आहे. मागील थकीत रक्कम भरल्याशिवाय पोलीस विभाग पुन्हा संरक्षण देण्याच्या मन:स्थितीत नसताना मंत्रालयस्तरावर हालचाली करून ती थकीत रक्कमच माफ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे कंपनी नियमित भाडे देईल या आशेने सुरजागड परिसरात अतिरिक्त पोलीस मदत केंद्र सुरू करण्यासाठीही गृह विभाग तयारीत आहे. असे असताना लॉयड्स मेटल्सने कोनसरीच्या प्रकल्पाला दिलेली बगल आणि पोलीस विभागाच्या भाड्याचे पैसे देण्यास होत असलेली टाळाटाळ पाहता या कंपनीचा उद्देश खरोखरच प्रामाणिक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रॉयल्टीच्या थकीत रकमेवर २४ टक्के व्याज

सदर कंपनीने पोलीस विभागाचे भाडेच नाही तर खनिकर्म विभागाकडील रॉयल्टीची रक्कमही अद्याप दिलेली नाही. रॉयल्टीच्या निकषानुसार कंपनीकडून खनिकर्म विभागाला १ कोटी ८० लाख रुपये घेणे होते. वारंवार स्मरणपत्र देऊनही कंपनीने ती रक्कम भरली नसल्यामुळे आता त्या रकमेवर २४ टक्के व्याज आकारण्यात आले. खनिकर्म विभागाने तीन महिन्यांपूर्वीच त्याबाबतचे पत्र कंपनीला देऊन व्याजासह २ कोटी ३५ लाख रुपये भरण्यास सांगितले आहे. मात्र, अजूनही ती रक्कम कंपनीने भरलेली नाही.