शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

चेन्ना प्रकल्पासाठी आंदोलन करणार

By admin | Updated: July 23, 2015 01:19 IST

तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्प अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

मुलचेरात शेतकऱ्यांची बैठक : प्रकल्प रखडल्याने शेतकरी सिंचनापासून वंचितमुलचेरा : तालुक्यातील चेन्ना सिंचन प्रकल्प अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने सदर प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रसंगी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी मुलचेरा येथे आयोजित बैठकीमध्ये केला. वीर बाबुराव शेडमाके सभागृहात घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी दादाजी सिडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून मधुसुदन गाईन, शैंलेंद्र खराती, विठ्ठल निखुले, हलदार, प्रकाश दत्ता, बादलशहा, सुभाष आत्राम, गणेश बंकावार, सरपंच हरिपद पांडे, सरपंच मारोती पल्लो उपस्थित होते. मुलचेरा तालुक्यातील चिन्ना सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागातर्फे १३ मे १९७७ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. १९७८ पासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. १९८० पर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले होते. यामुळे सदर प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळेल, अशी आशा बळावली होती. मात्र १९८० मध्ये वन संवर्धन कायदा लागू झाल्याने चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. तेव्हापासून सिंचन प्रकल्पाचे काम बंदच आहे. चेन्ना सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ३७७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या कामाचे सुरूवातीचे अंदाजपत्रक १ कोटी ८० लाख रूपयांचे होते. २०१४ पर्यंत प्रकल्पाची किंमत ८० कोटी रूपयांवर पोहोचली. या सिंचन प्रकल्पाचा फायदा तालुक्यातील १० ग्राम पंचायतींना होणार आहे. यामध्ये आठ ग्राम पंचायती आदिवासी व दोन ग्राम पंचायती बंगाली, अल्पसंख्यांक पुनर्वसित आहेत. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ वनहक्क कायदा २००८ अंतर्गत या प्रकल्पात ८० टक्के ओलीताखालील शेतीला फायदा होणार आहे. २०१४ मध्ये केंद्र सरकारकडून ८ हजार ६४० हेक्टर वनजमीन वनकायद्याच्या कचाट्यातून मुक्त करण्यात आली आहे. परंतु काम मार्गी लागले नाही.सभेला मुलचेरा तालुक्यातील गोमणी, गोविंदपूर, सुंदरनगर, मुलचेरा, बोलेपल्ली व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)