शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

वसतिगृहात समस्यांचा डोंगर

By admin | Updated: July 7, 2014 23:35 IST

शिक्षणासह विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही.

समूह निवासी शाळेत : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातएटापल्ली : शिक्षणासह विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. ही बाब अनेकदा उघडकीस आली आहे. एटापल्ली येथील समूह निवासी शाळेच्या वसतिगृहाची दूरवस्था झाली असून अनेक ठिकाणी घाण पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसतिगृहाच्या दूरवस्थेमुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एटापल्ली येथील समूह निवासी वसतिगृहात इयत्ता १ ली ते ७ पर्यंतचे विद्यार्थी निवासासह शिक्षण घेत आहेत. परंतु प्रशासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या अनेक सोयीसुविधांचा नेहमीच वसतिगृहात अभाव राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना मुबलक सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. शिवाय वसतिगृहाची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे वसतिगृह परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नियमित पाऊस सुरू झाल्यास रोगांची साथ पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वसतिगृहात सुविधा पुरविण्याबाबत तसेच दूरवस्थेबाबत पं.स. सदस्य संजय चरडुके यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन वसतिगृहातील समस्या मांडल्या. त्यानंतर संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी वसतिगृहाला भेट दिली व पाहणी केली. समूह निवासी शाळेच्या वसतिगृहात नवीन सुविधांसह पलंगांची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्हा परिषदेने पलंगांचा पुरवठा केला नाही, असे संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी वसतिगृह भेटी दरम्यान सांगितले. वसतिगृहाची झालेली दूरवस्था व वसतिगृहात असलेला सोयीसुविधांचा अभाव प्रशासनाने लक्ष घालून दूर करावा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संपूर्ण सुविधा पुरवाव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पं. स. सदस्य संजय चरडुके यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)