शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सर्वाधिक क्षयरुग्ण अहेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:19 IST

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत.

ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : जिल्हाभरात १ हजार ३६१ रुग्ण क्षयरोगाने ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे क्षयरोगामध्ये अहेरी तालुका सर्वाधिक प्रभावित असून या तालुक्यात तब्बल २३२ क्षयरुग्ण आहेत.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. मात्र शासकीय रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हिवताप व क्षयरोगाचा प्रकोप होत असतो. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यात ११९ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. भामरागड ६९, चामोर्शी १७१, धानोरा ९५, गडचिरोली १६०, एटापल्ली ८८, कोरची ५४, कुरखेडा ८७, मुलचेरा ७४, सिरोंचा १२२ व देसाईगंज तालुक्यात ९० क्षयरुग्ण आढळून आले आहेत.अहेरी उपविभागातील सिरोंचा तालुक्यातही क्षयरुग्णांची संख्या मोठी आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम गावांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच प्रशासनातर्फे प्रभावी जनजागृती होत नाही. त्यामुळे सतत २० ते २५ दिवस खोकला असूनही बरेच नागरिक तपासणी करीत नाहीत. परिणामी अशा रुग्णांना क्षयरोग झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे क्षयरोगाबाबत नागरिकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.गडचिरोली जिल्ह्यात हत्तीपाय रुग्णांची संख्या हजारावर आहे. अशा विविध रुग्णांवर वेळीच औषधोपचार करण्यासाठी दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही क्षयरोगावरील औषधसाठा नेहमीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. क्षयरोगाबाबत प्रबोधनासोबतच जनजागृतीही आवश्यक आहे. क्षयरोगावर उपचार करण्यास विलंब झाल्यास संबंधित रुग्ण दगावतो.सतत दोन आठवड्यापर्यंत खोकला असल्यास संबंधित व्यक्तींनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, वेळेवेर औषधी घेतली पाहिजे. सतकर्ता बाळगून काळजी घेतल्यास क्षयरोग हा लवकरच नियंत्रणात आणता येतो. आरोग्य विभागातर्फे क्षयरुग्णांची तपासणी मोफत केली जात असून त्यांना औषधीही मोफत पुरविली जात आहे.- डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली