शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:22 IST

१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत.

ठळक मुद्दे५५ लाख खड्डे तयार : ५१ लाखांचे उद्दिष्ट, १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवडीसाठी वन विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. यावरून यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड होण्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जागतिक तापमानातील वाढ, हवामान, ऋतू बदल यांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१६ मध्ये राज्यभरात २ कोटी व २०१७ मध्ये चार कोटीपेक्षा अधिक वृक्षांची लागवड झाली. तर २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी राज्यभरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढल्याने गडचिरोली जिल्ह्यालाही उद्दिष्ट वाढवून दिले आहे. यावर्षी ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. वन विभाग व इतर विभागांनी सद्य:स्थितीत ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. याचबरोबर सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत सुध्दा वृक्ष लागवड होणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याचा आशावाद वन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. वृक्ष लागवडीसाठी आता सात दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीची तयारी सुरू केली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल जुने आहे. त्यातील काही वृक्ष वयोमानानुसार करपले आहेत. त्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. वन विभागाकडे सर्वाधिक जमीन व यंत्रणा असल्याने वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वन विभागाला दिले आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याची जबाबदारी सुध्दा वन विभागाकडे सोपविली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी वन विभागाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.१ ते १० जुलैपर्यंत नागरिकांना रोपट्यांसाठी करता येईल नोंदणीवृक्ष लागवड योजनेमध्ये नागरिकांचाही सहभाग वाढावा या उद्देशाने नागरिकांना सवलतीच्या दरात रोपटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरात तीन स्टॉल, देसाईगंज शहरात दोन स्टॉल व इतर तालुकास्तरावर एक स्टॉल लावला जाणार आहे. या स्टॉलला वनमहोत्सव केंद्र हे नाव दिले जाईल. एका व्यक्तीला जास्तीत जास्त पाच व संस्थेला २५ रोपटे दिले जातील. लहान पिशवीतील रोपटे ८ रूपयांना व मोठ्या पिशवीतील रोपटे ४० रूपयांना सवलतीत दिले जाणार आहे. शोभीवंत झाडे, फळझाडे व सावली देणारी झाडे केंद्रावर उपलब्ध राहतील. १ ते १० जून या कालावधीत वृक्षांची नोंदणी करता येईल. ज्या दिवशी नोंदणी होईल, त्याच दिवशी संबंधित व्यक्तीला वन विभागाच्या वाहनामार्फत वृक्ष घरी पोहोचता करून दिले जातील. जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्षांच्या मागणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.विभागनिहाय खड्ड्यांची संख्यापावसाळ्यानंतर खड्डे खोदण्याच्या कामाला गती आली. शनिवारपर्यंत जिल्हाभरात ५५ लाख १६ हजार १५४ खड्डे खोदले आहेत. यामध्ये वन विभागाने ३३ लाख, एफडीसीएम १४ लाख ८ हजार, एसएफडी २ लाख ६० हजार, ग्रामपंचायत ४ लाख ८१ हजार, कृषी विभाग २४ हजार, शिक्षण ५३ हजार, उच्च व तंत्र शिक्षण ३८०, नगर विकास विभाग २ हजार ६५, सार्वजनिक बांधकाम विभाग ६ हजार ७१५, ग्राम विकास विभाग २ हजार ५२४, पोलीस विभाग ३ हजार ७५५, आदिवासी विकास विभाग १२ हजार ४७०, ऊर्जा २३०, परिवहन ५००, आरोग्य ७१५, जलसंपदा १ हजार ३४४, सहकार पणन व विपणन विभाग २ हजार ३६०, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २१५, कारागृह १००, कौशल्य उद्योजकता विभाग ३५०, महसूल ५४४, महिला व बाल कल्याण विभागाने ४ हजार १९ खड्डे खोदले आहेत. हे आकडे केवळ शासकीय विभागांचे आहेत. सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरात वृक्ष उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा आकडा ६० लाखांच्या वर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग