शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अर्ध्याअधिक ई-पासचे अर्ज नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील प्रवास झाला कठीण : आतापर्यंत २८०७ जणांना परवानगी, २८९९ जणांना नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तिसऱ्या लॉकडाऊनंतर ग्रिन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अंतर्गत प्रवासी वाहतूक आणि नंतर सर्व दुकाने उघडून व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. परंतू जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी विशिष्ट कारणासाठीच दिली जात असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने २८०९ लोकांना जिल्ह्याबाहेर जाऊन परत येण्यासाठी ई-पास दिली. २८९९ लोकांना मात्र पास नामंजूर केली. अजून २९ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले असल्यास त्यांना येथून जाण्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज असते. ती परवानगी मिळण्यात अडचणी नाही. परंतू नोकरी, व्यवसायानिमित्त इतर राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी घेताना थोड्या अडचणी जात आहेत.विशेष म्हणजे रेड झोनमधून येणाºयांना आता गुरूवारपासून (दि.१४) संस्थात्मक विलगिकरणात (इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन) राहणे आणि त्यांची स्वॅब टेस्ट करणे जिल्हाधिकाºयांनी आवश्यक केले आहे. ही अट मान्य असेल तरच जिल्ह्यात येण्याची परवानगी दिली जात असल्यामुळे अनेकांसाठी ही बाब अडचणीची ठरत आहे. आम्ही होम क्वॉरंटाईन ठेवतो असे सांगून अनेक जण प्रशासकीय यंत्रणेला गळ घात आहेत.पण होम क्वॉरंटाईन ठेवणे जोखमीचे ठरू शकत असल्यामुळे त्याला परवानगी देण्यास प्रशासन तयार नाही. संस्थात्मक विलगिकरणात असताना चाचणी अहवाल जर निगेटिव्ह आला तर घरी विलगिकरणात राहण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पाळीत ड्युटीसध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश यंत्रणा कोविड-१९ च्या कामातच गुंतलेली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना वेगवेगळ्या जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. ई-पासेस मंजूर-नामंजूर करण्यापासून तर येणाºया-जाणाºया लोकांसाठी मोफत एसटी बसेस, रेल्वे तिकीटची व्यवस्था करणे, विलगिकरणातील नागरिकांची नोंद आणि इतर अनेक जबाबदाºया सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० अशी दोन पाळीत अधिकारी-कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे.३७ लोकांचा अहवाल बाकीआतापर्यंत कोरोनाच्या संशयित २९६ रुग्णांपैकी २६१ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२४ जणांची चाचणी निगेटीव्ह आली असून ३७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्या ३७ लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार ९७३ प्रवासी आले आहेत. त्यांच्यापैकी २५ हजार ८६० लोकांनी घरी क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला. सध्या १२ हजार ७३९ नागरिक आपापल्या घरी क्वॉरंटाईन तर ६ हजार ३७४ नागरिक विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या