शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

काेराेनात ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक ...

बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयराेगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती काेराेनापासून सहज मुक्त हाेत हाेते. मात्र वयाेवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयराेग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र काेराेनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर हाेत हाेती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती हाेत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू हाेत हाेता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ काेराेना रूग्णांचा मृत्यू झाला. आराेग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त हाेते. सुरूवातीच्या कालावधीत काेराेनाची भयंकर भिती हाेती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत हाेता. तसेच मधुमेहग्रस्तही काेराेनाचे बळी पडले आहेत.

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिराेली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून ताे देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबराेबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयाेवृध्द नागरिकाची राेगप्रतिकारक क्षमता कमी हाेत असल्याने काेराेनापासून धाेका हाेत हाेता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आराेग्य विभागामार्फत दिला जात हाेता.

बाॅक्स

मधुमेह आहे, काळजी घ्या !

उच्च रक्तदाबाबराेबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना काेराेनापासून धाेका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर हाेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी काेराेना हाेणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती हाेण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास काेराेनापासून मुक्ती मिळण्यास मदत हाेईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.

राेग लपविल्याने अनेकांचा गेला जीव

काेराेनाची लागण हाेऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत हाेते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती हाेत हाेते. त्यामुळे नागरिकांनी याेग्य काळजी घेण्याची गरज आहे.