शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संगणक परिचालकांचे मानधन थकले

By admin | Updated: May 29, 2014 02:17 IST

ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले ...

 

गडचिरोली : ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले असून मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईन कंपनी विषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.

भारतातील सुमारे ७0 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मागील काही वर्षापासून ग्रामविकासाकडे विशेष लक्ष घातले आहे. नागरिकांचा योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यास योजना यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन गावामध्ये ग्रामसभा स्थापन केली आहे. त्याचबरोबर भविष्यात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरण आखले जात असल्याने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे संगणकीकरण केले जात आहे. भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई- गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीच्या कामाध्ये सुसुत्रता व पारदर्शकपणा आणणे हा या मागील उद्देश आहे. ग्रामपंचायतीचे सर्व दस्तावेज संगणकीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्राची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत ४१४ संगणक परिचालक कार्यरत आहेत. या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन देण्यात आले नाही. याबद्दल संगणक परिचालक तालुका समन्वयकांना वेळोवेळी विचारत आहेत. तालुका समन्वयक मात्र आठ दिवसांनी मानधन मिळेल, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. देशभरातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याच्या कामाला २00८ पासून सुरूवात झाली. ३ वर्षाचा कालावधी लोटूनही सर्व दस्तावेज ऑनलाईन झाले नाही. किंवा काही दस्तावेजांचे संगणकीकरणही झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यात शासनाला अडचणी येत आहेत. सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण करून ऑनलाईन करण्याविषयी अधिकार्‍यांवर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे काही अधिकारी दस्तावेज पूर्ण झाल्याशिवाय मे महिन्याचेही मानधन मिळणार नाही, अशी धमकी संगणक परिचालकांना देत आहेत. पहिलेच दोन महिन्याचे मानधन रखडल्याने संगणक परिचालक आर्थिक अडचणीत सापडले असतांना मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता असल्याने संगणक परिचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिचालकांची नियुक्ती करतेवेळी ८ हजार रूपये मानधन देण्याचे महाऑनलाईनने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ हजार ५00 रूपये मानधन दिले जात आहे. एवढय़ा कमी मानधनात महिन्याभराचा खर्च भागविणे अशक्य आहे. संगणक परिचालक काम करीत आहेत. तेही मानधन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईनच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ दिवसामध्ये मानधन उपलब्ध करून न दिल्यास कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाऑनलाईन कंपनी यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)