शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

संगणक परिचालकांचे मानधन थकले

By admin | Updated: May 29, 2014 02:17 IST

ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले ...

 

गडचिरोली : ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्रात काम करणार्‍या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन थकले असून मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईन कंपनी विषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे.

भारतातील सुमारे ७0 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मागील काही वर्षापासून ग्रामविकासाकडे विशेष लक्ष घातले आहे. नागरिकांचा योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्यास योजना यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन गावामध्ये ग्रामसभा स्थापन केली आहे. त्याचबरोबर भविष्यात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरण आखले जात असल्याने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे संगणकीकरण केले जात आहे. भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई- गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीच्या कामाध्ये सुसुत्रता व पारदर्शकपणा आणणे हा या मागील उद्देश आहे. ग्रामपंचायतीचे सर्व दस्तावेज संगणकीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर संग्राम केंद्राची स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत ४१४ संगणक परिचालक कार्यरत आहेत. या संगणक परिचालकांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन देण्यात आले नाही. याबद्दल संगणक परिचालक तालुका समन्वयकांना वेळोवेळी विचारत आहेत. तालुका समन्वयक मात्र आठ दिवसांनी मानधन मिळेल, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. देशभरातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याच्या कामाला २00८ पासून सुरूवात झाली. ३ वर्षाचा कालावधी लोटूनही सर्व दस्तावेज ऑनलाईन झाले नाही. किंवा काही दस्तावेजांचे संगणकीकरणही झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायती ऑनलाईन करण्यात शासनाला अडचणी येत आहेत. सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण करून ऑनलाईन करण्याविषयी अधिकार्‍यांवर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे काही अधिकारी दस्तावेज पूर्ण झाल्याशिवाय मे महिन्याचेही मानधन मिळणार नाही, अशी धमकी संगणक परिचालकांना देत आहेत. पहिलेच दोन महिन्याचे मानधन रखडल्याने संगणक परिचालक आर्थिक अडचणीत सापडले असतांना मे महिन्याचेही मानधन रखडण्याची शक्यता असल्याने संगणक परिचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिचालकांची नियुक्ती करतेवेळी ८ हजार रूपये मानधन देण्याचे महाऑनलाईनने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ हजार ५00 रूपये मानधन दिले जात आहे. एवढय़ा कमी मानधनात महिन्याभराचा खर्च भागविणे अशक्य आहे. संगणक परिचालक काम करीत आहेत. तेही मानधन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये महाऑनलाईनच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ दिवसामध्ये मानधन उपलब्ध करून न दिल्यास कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाऑनलाईन कंपनी यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)