शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

वीज बिल भरण्यासाठी मोबाईल व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:30 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगावातच सुविधा : आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी उभे करणार वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.विजेसह सर्व साहित्य व उपकरणे महावितरणला नगदी खरेदी करावी लागतात. त्यामुळे १०० टक्के वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. वीज बिलाच्या वसुलीचे प्रमाण वाढावे, यासाठी महावितरणने आजपर्यंत अनेक उपाय केले आहेत. ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडे मात्र स्मार्ट फोन राहत नाही. त्याचबरोबर मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने वीज बिल भरणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिलाचा भरणा बँकेत करावा लागतो. १० ते १२ किमी अंतरावर असलेल्या बँकेत जाऊन वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे काही नागरिक पैसे असूनही वीज बिल भरत नाही. गावातच वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोबाईल व्हॅन सेवा सुरू केली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील घोट शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड उपविभागातील पहार्णी, राजुरा उपविभागातील देवाडा, वरोरा तसेच चंद्रपूर उपविभागातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर मोबाईल व्हॅन नेली जाणार आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली कमी आहे, अशा गावांना विशेष प्राधान्य देऊन त्या गावामध्ये व्हॅन जाईल. प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या सुविधेचा आढावा तीन महिन्यानंतर घेतला जाणार आहे. नागरिकांकडून मिळणाºया प्रतिसादानंतर त्याठिकाणी ही सुविधा पुढे सुरू ठेवायची की नाही किंवा या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.वाहनात राहतील या सुविधावीज बिल भरणा केंद्रात संगणक, इंटरनेट आदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. वीज बिलाचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकाला पावती उपलब्ध करून दिली जाणार आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्गम भागातील गावे, दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेली गावे तसेच ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावांमध्ये सदर वाहन नेले जाईल.

टॅग्स :electricityवीज