शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:20 IST

आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही.

ठळक मुद्देबीएसएनएलचे दुर्लक्ष : भामरागडातील मोबाईलधारक त्रस्त, आॅनलाईन कामांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्याविना बीएसएनएलची भ्रमणध्वनीसेवा नाममात्र सुरू होती. मात्र येथे बीएसएनएलचे अधिकारी रूजू झाल्यानंतर थ्री-जी व टू-जी सेवा सुरळीत होती. मात्र ही सेवा सुद्धा सध्या विस्कळीत झाली आहे. एका ठिकाणाहून फोन लागते तर दुसऱ्या ठिकाणावरून संपर्क होत नाही. गेल्या दोन दिवसांपासून थ्री-जी सेवेच्या लाभापासून भ्रमणध्वनीधारक वंचित आहेत. बीएसएनएलची सेवा पूर्णत: ठप्प झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसानंतर बुधवारी पुन्हा दुपारनंतर बीएसएनएलची टू-जी सेवा सुरू झाली.यासंदर्भात बीएसएनएलचे अधिकारी दीपक कुमार यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अनेक कारणामुळे सोमवारी एक दिवस सेवा बंद होती. येथे डिजिटल जनरेटर येऊन १५ दिवस झाले. हा जनरेटर सुरू करावयाचा आहे.येत्या दोन दिवसांत जनरेटर कार्यान्वित करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा अविरत सुरू राहणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चंद्रा गावाजवळ केबल लाईन तुटल्यामुळे सेवा ठप्प झाली. पोलीस विभागाला कळविल्यानंतर तुटलेले केबल आज पुन्हा जोडण्यात आली, १० दिवसानंतर भामरागड तालुक्यात बीएसएनएलची थ्री-जी सेवा सुरू होणार आहे, असे दीपक कुमार यांनी सांगितले.पाच दिवसांपासून विजेचा लपंडावभामरागड तालुक्यात मागील पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम होत आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पूर्ववत होत नाही. सोमवारी दिवसा विजेचा लपंडाव होता तर संपूर्ण रात्रभर वीज गायब होती. त्यामुळे नागरिकांना डासांच्या प्रकोपाचा सामना करावा लागला. डासांमुळे रात्री झोपमोड होत आहे. वीज पुरवठा नियमित होत नसल्याने येथील व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विजेअभावी आॅनलाईन कामे करताना अडचणी येत आहेत. परंतु याकडे वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वेळीच उपाययोजना कराव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल