शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

वीज जाताच मोबाईल कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती.

ठळक मुद्देकोरचीतील स्थिती : बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या खराब, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर सुरू ठेवण्यासाठी बॅटऱ्यांचा उपयोग केला जातो. मात्र कोरची येथील बहुतांश मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद करते. परिणामी कोरची शहरातील क व्हरेज ठप्प होऊन हजारो मोबाईलधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती. आता ग्राहक वाढल्याने मोबाईल टॉवरची क्षमता सुद्धा वाढविणे आवश्यक होते. मात्र बीसएनएलने याकडे दुर्लक्ष केल्याने वाढत्या ग्राहकांना इंटरनेट स्पिड मिळत नाही. अनेकवेळा मोबाईल व्यस्त असल्याचे दाखविते. त्यामुळे मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.मोबाईल व इंटरनेट सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल टॉवरसोबत बॅटरी, जनरेटर राहते. मात्र येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या व्यवस्थित काम करीत नाहीत. तसेच जनरेटरही सुरू केले जात नाही. परिणामी वीज गुल होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद होते.कोरची तालुका शासन व प्रशासनदरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. छत्तीसगड राज्याला कोरची तालुक्याची सीमा लागून असल्याने येथील नागरिकांचा छत्तीसगड राज्याशी संपर्क येते. छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये झालेली प्रगती लक्ष वेधून घेते. तालुक्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अतिशय कनिष्ठ दर्जाचे आहे.छत्तीसगड राज्यातील क व्हरेजचा सहाराछत्तीसगड राज्यातील काही सीमावर्ती गावांमध्ये जीओ कंपनीने मोबाईल टॉवर उभारले आहेत. त्या टॉवरची रेंज कोरची येथील काही निवडक भागांमध्ये उपलब्ध होते. बीएसएनएलची सेवा ठप्प पडते. त्यावेळी नागरिक स्लॅबवर चढून जीओचे कव्हरेज शोधत राहतात. मात्र जीओचे टॉवर कोरचीपासून दूर असल्याने पाहिजे तेवढी स्पिड उपलब्ध होत नाही. कोरची येथे टॉवर उभारावे, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. जीओ कंपनी टॉवर उभारण्यास तयार आहे, मात्र प्रशासकीय अडचणी आल्यामुळे त्यांचा टॉवर उभा झालेला नाही.वारंवार नेटवर्क जाण्याबाबत बीएसएनएलच्या कोरची येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, कोरची येथील वीज २४ तासांपासून खंडित आहे. बॅटऱ्या केवळ चार तास चालू शकतात. त्यामुळेच मोबाईल टॉवर बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर थ्री-जी सेवा बंद केली जाते. केवळ टू-जी सेवा सुरू राहते, अशी माहिती दिली. सरकारी कंपनी असूनही प्रशासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :electricityवीजMobileमोबाइल