शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
2
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
3
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
4
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
5
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
6
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
7
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
8
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
9
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
10
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
11
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
12
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
13
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
14
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
15
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
16
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
17
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
18
प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
19
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
20
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स

वीज जाताच मोबाईल कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती.

ठळक मुद्देकोरचीतील स्थिती : बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या खराब, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर सुरू ठेवण्यासाठी बॅटऱ्यांचा उपयोग केला जातो. मात्र कोरची येथील बहुतांश मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद करते. परिणामी कोरची शहरातील क व्हरेज ठप्प होऊन हजारो मोबाईलधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती. आता ग्राहक वाढल्याने मोबाईल टॉवरची क्षमता सुद्धा वाढविणे आवश्यक होते. मात्र बीसएनएलने याकडे दुर्लक्ष केल्याने वाढत्या ग्राहकांना इंटरनेट स्पिड मिळत नाही. अनेकवेळा मोबाईल व्यस्त असल्याचे दाखविते. त्यामुळे मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.मोबाईल व इंटरनेट सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल टॉवरसोबत बॅटरी, जनरेटर राहते. मात्र येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या व्यवस्थित काम करीत नाहीत. तसेच जनरेटरही सुरू केले जात नाही. परिणामी वीज गुल होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद होते.कोरची तालुका शासन व प्रशासनदरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. छत्तीसगड राज्याला कोरची तालुक्याची सीमा लागून असल्याने येथील नागरिकांचा छत्तीसगड राज्याशी संपर्क येते. छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये झालेली प्रगती लक्ष वेधून घेते. तालुक्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अतिशय कनिष्ठ दर्जाचे आहे.छत्तीसगड राज्यातील क व्हरेजचा सहाराछत्तीसगड राज्यातील काही सीमावर्ती गावांमध्ये जीओ कंपनीने मोबाईल टॉवर उभारले आहेत. त्या टॉवरची रेंज कोरची येथील काही निवडक भागांमध्ये उपलब्ध होते. बीएसएनएलची सेवा ठप्प पडते. त्यावेळी नागरिक स्लॅबवर चढून जीओचे कव्हरेज शोधत राहतात. मात्र जीओचे टॉवर कोरचीपासून दूर असल्याने पाहिजे तेवढी स्पिड उपलब्ध होत नाही. कोरची येथे टॉवर उभारावे, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. जीओ कंपनी टॉवर उभारण्यास तयार आहे, मात्र प्रशासकीय अडचणी आल्यामुळे त्यांचा टॉवर उभा झालेला नाही.वारंवार नेटवर्क जाण्याबाबत बीएसएनएलच्या कोरची येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, कोरची येथील वीज २४ तासांपासून खंडित आहे. बॅटऱ्या केवळ चार तास चालू शकतात. त्यामुळेच मोबाईल टॉवर बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर थ्री-जी सेवा बंद केली जाते. केवळ टू-जी सेवा सुरू राहते, अशी माहिती दिली. सरकारी कंपनी असूनही प्रशासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :electricityवीजMobileमोबाइल