शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालय करणार सहा लाख वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणी टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रम चळवळीच्या रुपात राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देहरित महाराष्ट्र अभियान : विविध विभागासह पंचायत समित्यांना उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेला ६ लाख १८ हजार ५०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची कामेही सुरू झाली आहेत. परंतू एवढी रोपे जिल्ह्यात उपलब्ध होण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाणी टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रम चळवळीच्या रुपात राबविला जाणार आहे. जि.प.ला मिळालेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व विभागांना वाटून दिले. त्यात सर्वाधिक ४३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट माध्यमिक शिक्षण विभागाला तर २३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राथमिक शिक्षण विभागाकडे आहे. याशिवाय महिला व बालकल्याण विभागाला ४०००, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग आणि आरोग्य विभागाला प्रत्येकी ५००, बांधकाम विभाग, सिंचन विभाग, यांत्रिकी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाला प्रत्येकी ६५००, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला २०००, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला २३०० तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व स्वच्छ भारत मिशनला प्रत्येकी ५०० आणि समाज कल्याणला २०० चे उद्दिष्ट आहे. तसेच सर्व पंचायत समित्यांना प्रत्येकी ४२,४७५ वृक्ष लावायचे आहेत.रोपे आणणार कुठून?सदर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संबंधित विभागांना कळविल्यानंतर काही ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे सुरू झाले आहे. परंतू एवढे रोपटे आणणार कुठून हा प्रश्न कायम आहे. राज्य शासनाकडून फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान प्रधान सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या वेळोवेळी या वृक्ष लागवडीची कल्पना जि.प.च्या पंचायत विभागाला दिली आहे. परंतू पंचायत विभागाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपट्यांची मागणी वनविभागाकडे केली. आता वेळेवर एवढी रोपटी वनविभाग कशी उपलब्ध करून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग