शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

लाखो क्विंटल धान उघड्यावर

By admin | Updated: March 22, 2015 00:28 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ...

दिगांबर जवादे गडचिरोलीआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून खरेदी केंद्रावरच ठेवण्यात आले आहेत. सदर धानाची उचल करून ते गोदामामध्ये ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासोबतच बीपीएल लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या मार्फतीने आदिवासी विकास महामंडळ उपयोजना क्षेत्रात धानाची खरेदी करते. गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत यावर्षी ५६ धान खरेदी केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धानाची खरेदी करण्यात आली. सुरूवातीपासून १७ मार्चपर्यंत ५६ केंद्रावर सुमारे तीन लाख आठ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी केवळ ५१ हजार १३० क्विंटल धान गोदामात व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. तर ७१ हजार १०४ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक निघताच धानाची विक्री केली. त्यामुळे मागील दोन महिन्यात धानाची प्रचंड प्रमाणात आवक वाढली होती. त्या तुलनेत भरडाईची गती कमी असल्याने धानाची उचल करण्यात अडचण जात आहे. धान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये आदिवासी विकास महामंडळ शासनाची एजन्सी म्हणून काम करते. त्यामुळे धानाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून खरेदी केलेला धान उचल होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळाने सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवला आहे. धानाचे अवकाळी पाऊस व मोकाट जनावरांमुळे नुकसानही होत आहे. सदर नुकसान खरेदी केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांना उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)अनुभवातून धडा नाहीचधानाची उचल न झाल्याने दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले लाखो क्विंटल धान खराब झाले. या धानाची दुर्गंधी यायला लागली. परिणामी १४०० रूपये क्विंटलने घेतलेले धान १०० रूपये क्विंटल दराने विकण्याची पाळी शासनावर आली होती. त्यावर्षी शासनाला कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. यापासून शासन काही धडा शिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांपासून धान उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. गोदामांची कमतरताखरेदी केलेले धान भरडाई करून अन्न महामंडळाला विकल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अन्न महामंडळाकडे अत्यंत मर्यादित प्रमाणात गोदाम उपलब्ध आहेत. त्यामुळे भरडाई केलेले तांदूळ ठेवण्याची अडचण आहे. परिणामी महिन्याचे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच धान भरडाई करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळेच धानाची उचल करण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतरही गोदाम नसल्याने धानही ठेवण्याची अडचण निर्माण झाली आहे.