शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

लाखो क्विंटल धान उघड्यावर

By admin | Updated: March 22, 2015 00:28 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ...

दिगांबर जवादे गडचिरोलीआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून खरेदी केंद्रावरच ठेवण्यात आले आहेत. सदर धानाची उचल करून ते गोदामामध्ये ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासोबतच बीपीएल लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या मार्फतीने आदिवासी विकास महामंडळ उपयोजना क्षेत्रात धानाची खरेदी करते. गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत यावर्षी ५६ धान खरेदी केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धानाची खरेदी करण्यात आली. सुरूवातीपासून १७ मार्चपर्यंत ५६ केंद्रावर सुमारे तीन लाख आठ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी केवळ ५१ हजार १३० क्विंटल धान गोदामात व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. तर ७१ हजार १०४ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक निघताच धानाची विक्री केली. त्यामुळे मागील दोन महिन्यात धानाची प्रचंड प्रमाणात आवक वाढली होती. त्या तुलनेत भरडाईची गती कमी असल्याने धानाची उचल करण्यात अडचण जात आहे. धान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये आदिवासी विकास महामंडळ शासनाची एजन्सी म्हणून काम करते. त्यामुळे धानाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून खरेदी केलेला धान उचल होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळाने सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवला आहे. धानाचे अवकाळी पाऊस व मोकाट जनावरांमुळे नुकसानही होत आहे. सदर नुकसान खरेदी केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांना उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)अनुभवातून धडा नाहीचधानाची उचल न झाल्याने दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले लाखो क्विंटल धान खराब झाले. या धानाची दुर्गंधी यायला लागली. परिणामी १४०० रूपये क्विंटलने घेतलेले धान १०० रूपये क्विंटल दराने विकण्याची पाळी शासनावर आली होती. त्यावर्षी शासनाला कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. यापासून शासन काही धडा शिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांपासून धान उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. गोदामांची कमतरताखरेदी केलेले धान भरडाई करून अन्न महामंडळाला विकल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अन्न महामंडळाकडे अत्यंत मर्यादित प्रमाणात गोदाम उपलब्ध आहेत. त्यामुळे भरडाई केलेले तांदूळ ठेवण्याची अडचण आहे. परिणामी महिन्याचे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच धान भरडाई करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळेच धानाची उचल करण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतरही गोदाम नसल्याने धानही ठेवण्याची अडचण निर्माण झाली आहे.