शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

लाखो क्विंटल धान उघड्यावर

By admin | Updated: March 22, 2015 00:28 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ...

दिगांबर जवादे गडचिरोलीआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून खरेदी केंद्रावरच ठेवण्यात आले आहेत. सदर धानाची उचल करून ते गोदामामध्ये ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासोबतच बीपीएल लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या मार्फतीने आदिवासी विकास महामंडळ उपयोजना क्षेत्रात धानाची खरेदी करते. गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत यावर्षी ५६ धान खरेदी केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धानाची खरेदी करण्यात आली. सुरूवातीपासून १७ मार्चपर्यंत ५६ केंद्रावर सुमारे तीन लाख आठ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी केवळ ५१ हजार १३० क्विंटल धान गोदामात व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. तर ७१ हजार १०४ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक निघताच धानाची विक्री केली. त्यामुळे मागील दोन महिन्यात धानाची प्रचंड प्रमाणात आवक वाढली होती. त्या तुलनेत भरडाईची गती कमी असल्याने धानाची उचल करण्यात अडचण जात आहे. धान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये आदिवासी विकास महामंडळ शासनाची एजन्सी म्हणून काम करते. त्यामुळे धानाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून खरेदी केलेला धान उचल होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळाने सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवला आहे. धानाचे अवकाळी पाऊस व मोकाट जनावरांमुळे नुकसानही होत आहे. सदर नुकसान खरेदी केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांना उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)अनुभवातून धडा नाहीचधानाची उचल न झाल्याने दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले लाखो क्विंटल धान खराब झाले. या धानाची दुर्गंधी यायला लागली. परिणामी १४०० रूपये क्विंटलने घेतलेले धान १०० रूपये क्विंटल दराने विकण्याची पाळी शासनावर आली होती. त्यावर्षी शासनाला कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. यापासून शासन काही धडा शिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांपासून धान उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. गोदामांची कमतरताखरेदी केलेले धान भरडाई करून अन्न महामंडळाला विकल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अन्न महामंडळाकडे अत्यंत मर्यादित प्रमाणात गोदाम उपलब्ध आहेत. त्यामुळे भरडाई केलेले तांदूळ ठेवण्याची अडचण आहे. परिणामी महिन्याचे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच धान भरडाई करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळेच धानाची उचल करण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतरही गोदाम नसल्याने धानही ठेवण्याची अडचण निर्माण झाली आहे.