शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

कृषी तंत्रज्ञानावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:24 IST

कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा उपक्रम : प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात येते. याशिवाय मुद्रीत साहित्य तसेच ध्वनीचित्रफितीचा सुध्दा वापर करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते.सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन, रेशीम संगोपन, दुग्ध व्यवसाय विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी यंत्रणांनी सदर उपक्रमात सहभाग घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला.हे उपक्रम राबविण्यासाठी यंत्रणानिहाय शासकीय निधी अनुदानाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला. यामध्ये कृषी विभागाला १ कोटी २४ लाख ३८ हजार, कृषी विज्ञान केंद्राला ६ लाख ४० हजार, मत्स्य व्यवसाय विभागाला ७ लाख ३९ हजार, पशुसंवर्धन विभागाला ४ लाख ४० हजार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाला १३ लाख ८ हजार, रेशीम संगोपन विभागाला ८ लाख १८ हजार व महिला आर्थिक विकास महामंडळाला २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सर्व यंत्रणा मिळून एकूण १ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.धान उत्पादक शेतकºयांना प्रशिक्षणआत्मा गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय शेतीच्या स्वरूपात ३१ गट तयार करण्यात आले असून २ हजार २०० एकर क्षेत्रावर १ हजार ५५० शेतकऱ्यांद्वारे भारत सरकारच्या पीजीएस इंडिया प्रमाणे अंतर्गत सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन केले जात आहे. या शेतमालाच्या विपणनासाठी गोफ्स नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमालाचे मार्केटींग करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, प्रशिक्षणाचा कार्यक्रम सिक्कीम येथे करण्यात आले होते. संपूर्ण सेंद्रीय शेती राज्य या संकल्पनेवर गटात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.फेसबूक व युट्युब चॅनलद्वारेही जनजागृतीकृषी विभागाच्या विविध योजना, आत्मा कार्यालयाद्वारे शेतकºयांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व इतर बाबींची माहिती कार्यालयीन फेसबूक व युट्युब चॅनलद्वारे नियमित प्रसारीत केली जात आहे. या माध्यमातून धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत शेतकºयांना योग्य सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती