शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञानावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:24 IST

कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआत्माचा उपक्रम : प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले कृषी तंत्रज्ञान, लागवडीच्या विविध पध्दती शेतकऱ्यांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षात अशाच प्रकारचे कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण प्रात्यक्षिके, अभ्यासदौरे, कृषी प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात येते. याशिवाय मुद्रीत साहित्य तसेच ध्वनीचित्रफितीचा सुध्दा वापर करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते.सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, मत्स्य व्यवसाय विभाग, पशुसंवर्धन, रेशीम संगोपन, दुग्ध व्यवसाय विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी यंत्रणांनी सदर उपक्रमात सहभाग घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला.हे उपक्रम राबविण्यासाठी यंत्रणानिहाय शासकीय निधी अनुदानाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला. यामध्ये कृषी विभागाला १ कोटी २४ लाख ३८ हजार, कृषी विज्ञान केंद्राला ६ लाख ४० हजार, मत्स्य व्यवसाय विभागाला ७ लाख ३९ हजार, पशुसंवर्धन विभागाला ४ लाख ४० हजार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाला १३ लाख ८ हजार, रेशीम संगोपन विभागाला ८ लाख १८ हजार व महिला आर्थिक विकास महामंडळाला २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या सर्व यंत्रणा मिळून एकूण १ कोटी ६२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.धान उत्पादक शेतकºयांना प्रशिक्षणआत्मा गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय शेतीच्या स्वरूपात ३१ गट तयार करण्यात आले असून २ हजार २०० एकर क्षेत्रावर १ हजार ५५० शेतकऱ्यांद्वारे भारत सरकारच्या पीजीएस इंडिया प्रमाणे अंतर्गत सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन केले जात आहे. या शेतमालाच्या विपणनासाठी गोफ्स नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतमालाचे मार्केटींग करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, प्रशिक्षणाचा कार्यक्रम सिक्कीम येथे करण्यात आले होते. संपूर्ण सेंद्रीय शेती राज्य या संकल्पनेवर गटात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.फेसबूक व युट्युब चॅनलद्वारेही जनजागृतीकृषी विभागाच्या विविध योजना, आत्मा कार्यालयाद्वारे शेतकºयांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व इतर बाबींची माहिती कार्यालयीन फेसबूक व युट्युब चॅनलद्वारे नियमित प्रसारीत केली जात आहे. या माध्यमातून धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत शेतकºयांना योग्य सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती