शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेने बस गेली खड्ड्यात

By admin | Updated: July 13, 2017 01:49 IST

अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

सुदैवाने जिवितहानी टळली : मथुरानगरच्या नाल्याजवळील घटना लोकमत न्यूज नेटवर्क गोमणी : अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्तरावरील यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गोमणी परिसरातील मथुरानगरनजीकच्या नाल्यालगत अरूंद रस्ता असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस खड्ड्यात गेली. मात्र सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी घडली नाही. सदर घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर-गोमणी-मुलचेरा-गोविंदपूर ही एमएच-४०-एन-९९९३ क्रमांकाची बस गोविंदपूरवरून मुलचेरा मार्गे चंद्रपूरला प्रवाशी घेऊन निघाली. मथुरानगरजवळ नाल्यावरील पुलाच्या काही अंतरावर पावसामुळे रस्ता पूर्णत: खचला असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्याच्या जवळ बस येताच सदर बसचा एक चाक खड्ड्यात गेला व बसचा तोल संपूर्ण एका बाजूने झाला. बसचालकाने सतर्कत: दाखविल्यामुळे बस उलटली नाही. सदर बसमध्ये ५० ते ६० प्रवाशी बसले होते. यामध्ये ३० ते ३५ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. बस पुलाच्या काही अंतरावर येताच अर्धा रस्ता खचून गेला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणत्याही प्रवाशाला नुकसान पोहोचले नाही. सदर बसमधील काही प्रवाशांनी या घटनेची माहिती देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराला दूरध्वनी क्रमांकावर फोन केला. मात्र फोनला प्रतिसाद मिळाला नाही, असे बसमधील प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर या बसच्या चालकाने थेट अहेरी आगार गाठले. मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या अनेक दुर्गम गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था बकाल आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होत असल्याने महामंडळाच्या बसेस अनेकदा खड्ड्यात फसल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनाही प्रचंड त्रास होत असतो. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही प्रशासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची पक्की दुरूस्ती अद्यापही केली नाही. बस खड्ड्यात अडकणे, रस्त्यांच्या दुरवस्थेने बसला किरकोळ अपघात होणे व इतर घटनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला लाखो रूपयांचे नुकसान सहन करावा लागत आहे.