शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

गणरायाला भावपूर्ण निरोप...

By admin | Updated: September 17, 2016 02:37 IST

‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मुंबईकरांनी लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी मोठ्या जल्लोषात निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजानेही दिवसभर कडक सलामी दिली

मुंबई : ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मुंबईकरांनी लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी मोठ्या जल्लोषात निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजानेही दिवसभर कडक सलामी दिली. पावसाच्या रंगात भक्तीचा रंग मिसळल्याने गुरुवारी सकाळी सुरू झालेले विसर्जन सोहळे शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होते.महिनाभर दडी मारलेल्या पावसाने बाप्पाला निरोप देण्यासाठी गुरुवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळी रस्त्यांवरील भक्तांची संख्या काहीशी कमी होती. मात्र मिरवणुकांना सुरुवात होताच, मुंबईकरांनी रस्त्यांवर गर्दी करायला सुरुवात केली. ३५ हजार पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये लाखो मुंबईकर गेट वे आॅफ इंडियापासून दादर, गिरगाव, जुहू चौपाट्यांसह प्रमुख विसर्जनस्थळांवर एकवटले होते.पावसाच्या व्यत्ययामुळे गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना काहीशा उशिराने सुरुवात झाली. गिरणगावातील माथाडींचा गणपती म्हणून ओळख असलेला ‘कॉटनग्रीनचा राजा’ने कॉटनग्रीनमार्गे लालबागमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ गणेश गल्लीमधील ‘मुंबईचा राजा’ आणि मग सकाळी ११ वाजता ‘लालबागचा राजा’ दरबारातून बाहेर पडला. या सर्व राजांच्या दर्शनासाठी सकाळी ७ वाजल्यापासूनच लालबाग परिसरात गणेशभक्तांनी गर्दी केली होती. परिसरातील इमारतींसोबतच दुकानांच्या छपरांचाही गणेशभक्तांनी ताबा घेतला होता. डीजेचा दणदणाट आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरासह गुलालाची उधळण करत बाप्पाच्या मिरवणुका हळूहळू पुढे सरकत होत्या. स्थानिक मंडळांकडून अल्पोपाहार वाटप करत गणेशभक्तांची क्षुधा शांत करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याशिवाय अनेक ठिकाणी गणेशभक्तांसाठी पाण्याचे वाटपही केले जात होते. घोडपदेव, बकरी अड्डा, काळाचौकी आणि लालबाग येथील नयनरम्य पुष्पवृष्टी सोहळ्यांनी सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. बाप्पाच्या डोक्यावर होणाऱ्या पुष्पवृष्टीपासून थेट गळ्यात जाणाऱ्या हाराने भक्तांच्या घोषणांनी बाप्पाचा निरोप सोहळा रात्रभर सुरू होता. (प्रतिनिधी)गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, खारदांडा, शिवडी जेट्टी, वेसावे जेट्टी, मढ-मार्वे जेट्टी, आरे कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव), पवई तलाव, मुलुंड, भांडुप या मुख्य विसर्जनस्थळी २ लाख १० हजार ११८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर कृत्रिम तलावांमध्ये ३० हजार ३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गतवर्षी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची संख्या एकूण १ लाख ९२ हजार ३०८ इतकी होती तर कृत्रिम तलावांमधील विसर्जित गणेशमूर्तींची संख्या २५ हजार ४५३ होती.कपूर कुटुंबीयांची चाहत्यांना मारहाणबाप्पांचे विसर्जन होत असताना मुंबईत अभिनेते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह रणबीर कपूर यांनी पत्रकारांसह चाहत्यांना मारहाण केल्याची घटना घडली. आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी हजेरी लावली. आरती झाल्यावर एका पत्रकाराने रणधीर यांना प्रतिक्रिया विचारली होती, मात्र रणधीर कपूर यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. तर ऋषी कपूर यांनीही सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला मारहाण केली. पवई परिसरात वाहतूककोंडीअनंत चतुर्दशीच्या दिवशी पवई तलावातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र हे विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहिल्याने पवई परिसरात मोठ्या वाहतूककोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. त्याचा फटका थेट जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहनांना बसला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्यासाठी नेहमीपेक्षा किती तरी अधिक वेळ लागत होता. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या परिसरात वाहतूककोंडी होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बाप्पांचे विसर्जन निर्विघ्न पारमुंबई : किरकोळ घटना सोडल्यास मुंबईत बाप्पांचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. बाप्पांचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा गुड मॉर्निंग पथकांसह पहाटेपासूनच कामाला लागली होती. तब्बल ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होता. विसर्जनाच्या मुख्य ठिकाणांवर मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांबरोबर केलेल्या नियोजनामुळे यंदा वाहतूककोंडीचा फटका बसला नाही. दरम्यान, कुलाबा येथील रेडिओ क्लब येथे मध्य प्रदेशातून फिरायला आलेला देविश कनसिथीया (२६) समुद्राच्या काठावर बसला होता. अचानक तोल जाऊन तो खाली कोसळला. मात्र तेथे असलेल्या पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली. चारकोप पोलीस ठाण्याचे पीएसआय नाईक यांनी रस्त्यावर दारुच्या नशेत झोपलेल्या गर्दुल्ल्याला हटकले. याच रागातून गर्दुल्ल्याने त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या किरकोळ घटना सोडल्यास विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला.