शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पारा प्रचंड वाढला, आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:52 IST

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, .....

ठळक मुद्देजनजीवन काही प्रमाणात प्रभावित : निरोगी आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्याचा आरोग्य प्रशासनाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, तसेच पारा वर चढत असल्याने सध्यातरी घराबाहेर निघताना आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशा सल्ला आरोग्य प्रशासन व तज्ज्ञांकडून दिला जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीला काही दिवस उष्णतामानाचा पारा वर चढला होता. परंतु त्यानंतर झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे काही काळाकरिता वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा सूर्याने आपले रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐरवी नेहमी गर्दी राहणारे अनेक रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य दिसून येतात. तसेच भर उन्हात घराबाहेर पडणारे अनेक लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी फायदेशिर ठरणारे लिंबूसरबत, मठ्ठा, उसाचा रस, लस्सी सेवन करताना दिसून येत आहेत. एकूणच वाढत्या उन्हामुळे जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.दुपारी घराबाहेर निघू नकावाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळले पाहिजे. विशेष करून लहान मुलांना प्रवासासाठी उन्हात नेऊ नये. सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास प्रवास करावा. जेणे करून उन्हापासून बचाव होईल.पुरेसे पाणी प्यावेभर उन्हात घराबाहेर पडणाऱ्यांसह इतरांनीही उन्हाळ्याच्या दिवसात जास्त घाम येत असल्याने तहाण लागली नाही तरी पुरेसे पाणी पिले पाहिजे. दिवसभर गेलेल्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे वाढत्या उष्णतामानात पुरेसे पाणी पिणे फायदेशिर ठरते.पाणपोईची संख्या अल्पजीवाची काहीली करणाºया प्रत्येक वाटसरूला उन्हापासून दिलासा मिळून पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत काही संघटनांतर्फे पाणपोई विविध ठिकाणी लावल्या जाते. मात्र यंदा पाणपोईची संख्या जिल्ह्यात अल्प दिसून येत आहे.जनावरांना सावलीत ठेवाउन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी पिण्याकरिता द्यावे, अशक्त व कमजोरीसारखे जाणवत असल्यास तत्काळ पशु वैदयकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे.अशाप्रकारे घर थंड ठेवावेउन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना नागरिकांनी पिण्याचे पाणी सोबत घ्यावे, तसेच आपले घर कसे थंड ठेवता येईल, यासाठीही प्रयत्न करावे.घराला पडदे, झडपा, सनशेड बसवावे, रात्रीच्या सुमारास खिडक्या उघड्या ठेवाव्यात, उन्हाचा तडाखा जाणवल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी. शिवाय फॅन व कुलरचा वापर करावा. अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा.सौम्य रंगाचे सुती कपडे परिधान करावेउन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सौम्य रंगाचे तसेच सैल व कॉटनचे कपडे परिधान केले पाहिजे. घराबाहेर पडताना बाहेर गॉगल, छत्री, टोपी, बुट तसेच चप्पल वापरावे. पांढरा दुपट्टा डोक्याला बांधणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचा वाढत्या उन्हापासून बचाव होत असतो.अनेक नागरिकांना ऋतुमानानुसार कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसात सौम्य रंगाचे सैल व सुती कपडे वापरणे फायदेशिर ठरते. लहान मुला-मुलींनाही उन्हाळ्यात कपडे घालून देताना काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Temperatureतापमान