शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

दोन वर्षात प्रथमच साजरी होणार मेघनाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 01:38 IST

विदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे.

मौशीखांब येथे तीन दिवस मोठी यात्रा : अश्वासह दशाननपुत्राची करतात पूजागोपाल लाजूरकर गडचिरोलीविदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे. येथे मेघनाद यात्रा दरवर्षी भरविली जाते. मात्र बऱ्याच कालावधीनंतर यंदा ही यात्रा सलग दोन वर्षात उत्सवरुपाने साजरी केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०१५ ला यात्रेला प्रारंभ होणार असून २ जानेवारी २०१६ पर्यंत ही यात्रा चालणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग यंदा घडून आला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर फार पुरातन आहे. मंदिराचे स्वरूप पालटले असले तरी विदर्भातील एकमेव मेघनादांचे मंदिर म्हणून गणले जाते. श्री दत्त जयंतीनंतर दरवर्षी मौशीखांब येथे मेघनादांची तीन दिवशीय यात्रा भरविली जाते. सदर यात्रा जिल्ह्यातील मार्र्कंडानंतर सर्वात मोठी यात्रा आहे. असे असतानाही शासनाच्या उदासीनतेमुळे मेघनाद देवस्थान दुर्लक्षित आहे. भक्तिभाव असला म्हणजे, दैत्य वा देव याची पारख भाविकाला राहत नाही. मौशीखांब येथे रावणपुत्र मेघनाद यांची भक्तिभावाने पूजा गावकरी गावनिर्मितीच्या काळापासूनच पिढ्यान्पिढ्या करीत आले आहेत. मेघनाद दैत्य वा देव याची किंचीतही साशंक भावना त्यांच्या मनात आली नाही. वर्षानुवर्षे भक्तिभावाचा वसा आजतागायत गावकऱ्यांनी जोपासला आहे. प्रारंभी मेघनाद देवाचे मंदिर एका झोपडीत होते. कालानुरूप या मंदिराचे स्वरूप बदलले. १९८५-८६ या वर्षात लोकवर्गणीतून मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले. घोड्यावर स्वार असलेले मेघनाद आज मंदिरात स्थित आहेत. शिवाय मंदिरात छोटे-मोठे मातीचे घोडेही आहेत. दरवर्षी भाविक मेघनादांच्या नावाची उपासना करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला घोडा दान देतात. मेघनादांचे मूळ स्थान आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे आहे, असा समज गावकऱ्यांचा आहे. मात्र मौशीखांब येथेच मंदिर असल्याने भाविकांची अपार श्रध्दा मेघनादांवर आहे. गावातील सुख, शांती अबाधित राहावी यासाठी एक वर्षाआड सागवानाचे खांब गाडले जाते. क्षतिग्रस्त घोड्यांच्या मूर्त्या नदीत प्रवाहित केल्या जातात. दरवर्षी नवीन घोड्यांच्या मूर्त्या देवस्थानाला भाविक दान स्वरूपात देतात. मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर विदर्भातील एकमेव मंदिर आहे. मात्र सदर मंदिर शासनाच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित आहे. कदाचित सदर मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याबाबत तीळमात्र शंका भाविकांच्या मनात नाही. गुरुवारपासून तीन दिवशीय यात्रेला सुरुवात होणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे.