शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दोन वर्षात प्रथमच साजरी होणार मेघनाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 01:38 IST

विदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे.

मौशीखांब येथे तीन दिवस मोठी यात्रा : अश्वासह दशाननपुत्राची करतात पूजागोपाल लाजूरकर गडचिरोलीविदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे. येथे मेघनाद यात्रा दरवर्षी भरविली जाते. मात्र बऱ्याच कालावधीनंतर यंदा ही यात्रा सलग दोन वर्षात उत्सवरुपाने साजरी केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०१५ ला यात्रेला प्रारंभ होणार असून २ जानेवारी २०१६ पर्यंत ही यात्रा चालणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग यंदा घडून आला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर फार पुरातन आहे. मंदिराचे स्वरूप पालटले असले तरी विदर्भातील एकमेव मेघनादांचे मंदिर म्हणून गणले जाते. श्री दत्त जयंतीनंतर दरवर्षी मौशीखांब येथे मेघनादांची तीन दिवशीय यात्रा भरविली जाते. सदर यात्रा जिल्ह्यातील मार्र्कंडानंतर सर्वात मोठी यात्रा आहे. असे असतानाही शासनाच्या उदासीनतेमुळे मेघनाद देवस्थान दुर्लक्षित आहे. भक्तिभाव असला म्हणजे, दैत्य वा देव याची पारख भाविकाला राहत नाही. मौशीखांब येथे रावणपुत्र मेघनाद यांची भक्तिभावाने पूजा गावकरी गावनिर्मितीच्या काळापासूनच पिढ्यान्पिढ्या करीत आले आहेत. मेघनाद दैत्य वा देव याची किंचीतही साशंक भावना त्यांच्या मनात आली नाही. वर्षानुवर्षे भक्तिभावाचा वसा आजतागायत गावकऱ्यांनी जोपासला आहे. प्रारंभी मेघनाद देवाचे मंदिर एका झोपडीत होते. कालानुरूप या मंदिराचे स्वरूप बदलले. १९८५-८६ या वर्षात लोकवर्गणीतून मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले. घोड्यावर स्वार असलेले मेघनाद आज मंदिरात स्थित आहेत. शिवाय मंदिरात छोटे-मोठे मातीचे घोडेही आहेत. दरवर्षी भाविक मेघनादांच्या नावाची उपासना करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला घोडा दान देतात. मेघनादांचे मूळ स्थान आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे आहे, असा समज गावकऱ्यांचा आहे. मात्र मौशीखांब येथेच मंदिर असल्याने भाविकांची अपार श्रध्दा मेघनादांवर आहे. गावातील सुख, शांती अबाधित राहावी यासाठी एक वर्षाआड सागवानाचे खांब गाडले जाते. क्षतिग्रस्त घोड्यांच्या मूर्त्या नदीत प्रवाहित केल्या जातात. दरवर्षी नवीन घोड्यांच्या मूर्त्या देवस्थानाला भाविक दान स्वरूपात देतात. मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर विदर्भातील एकमेव मंदिर आहे. मात्र सदर मंदिर शासनाच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित आहे. कदाचित सदर मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याबाबत तीळमात्र शंका भाविकांच्या मनात नाही. गुरुवारपासून तीन दिवशीय यात्रेला सुरुवात होणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे.