शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

दोन वर्षात प्रथमच साजरी होणार मेघनाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 01:38 IST

विदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे.

मौशीखांब येथे तीन दिवस मोठी यात्रा : अश्वासह दशाननपुत्राची करतात पूजागोपाल लाजूरकर गडचिरोलीविदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे. येथे मेघनाद यात्रा दरवर्षी भरविली जाते. मात्र बऱ्याच कालावधीनंतर यंदा ही यात्रा सलग दोन वर्षात उत्सवरुपाने साजरी केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०१५ ला यात्रेला प्रारंभ होणार असून २ जानेवारी २०१६ पर्यंत ही यात्रा चालणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग यंदा घडून आला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर फार पुरातन आहे. मंदिराचे स्वरूप पालटले असले तरी विदर्भातील एकमेव मेघनादांचे मंदिर म्हणून गणले जाते. श्री दत्त जयंतीनंतर दरवर्षी मौशीखांब येथे मेघनादांची तीन दिवशीय यात्रा भरविली जाते. सदर यात्रा जिल्ह्यातील मार्र्कंडानंतर सर्वात मोठी यात्रा आहे. असे असतानाही शासनाच्या उदासीनतेमुळे मेघनाद देवस्थान दुर्लक्षित आहे. भक्तिभाव असला म्हणजे, दैत्य वा देव याची पारख भाविकाला राहत नाही. मौशीखांब येथे रावणपुत्र मेघनाद यांची भक्तिभावाने पूजा गावकरी गावनिर्मितीच्या काळापासूनच पिढ्यान्पिढ्या करीत आले आहेत. मेघनाद दैत्य वा देव याची किंचीतही साशंक भावना त्यांच्या मनात आली नाही. वर्षानुवर्षे भक्तिभावाचा वसा आजतागायत गावकऱ्यांनी जोपासला आहे. प्रारंभी मेघनाद देवाचे मंदिर एका झोपडीत होते. कालानुरूप या मंदिराचे स्वरूप बदलले. १९८५-८६ या वर्षात लोकवर्गणीतून मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले. घोड्यावर स्वार असलेले मेघनाद आज मंदिरात स्थित आहेत. शिवाय मंदिरात छोटे-मोठे मातीचे घोडेही आहेत. दरवर्षी भाविक मेघनादांच्या नावाची उपासना करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला घोडा दान देतात. मेघनादांचे मूळ स्थान आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे आहे, असा समज गावकऱ्यांचा आहे. मात्र मौशीखांब येथेच मंदिर असल्याने भाविकांची अपार श्रध्दा मेघनादांवर आहे. गावातील सुख, शांती अबाधित राहावी यासाठी एक वर्षाआड सागवानाचे खांब गाडले जाते. क्षतिग्रस्त घोड्यांच्या मूर्त्या नदीत प्रवाहित केल्या जातात. दरवर्षी नवीन घोड्यांच्या मूर्त्या देवस्थानाला भाविक दान स्वरूपात देतात. मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर विदर्भातील एकमेव मंदिर आहे. मात्र सदर मंदिर शासनाच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित आहे. कदाचित सदर मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याबाबत तीळमात्र शंका भाविकांच्या मनात नाही. गुरुवारपासून तीन दिवशीय यात्रेला सुरुवात होणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे.