शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

सूरजागड प्रकल्पाबाबत कंपनीशी लवकरच घेणार बैठक

By admin | Updated: April 22, 2016 03:20 IST

एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले आहे. करारनाम्यानुसार हे काम थांबविता येणार नाही, उद्या जर कंपनी न्यायालयात गेली तर कायमस्वरूपी हे काम प्रलंबित होऊन जाईल, त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका, येत्या दहा दिवसांत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावून सर्व बाबी समजावून घेतल्या जातील व प्रकल्प जिल्ह्यात उभा करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे प्रथम काम सरकार करेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २००७ मध्ये तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या खासगी कंपन्यांना सूरजागड पहाडीवर लीज मंजूर केली. तब्बल दहा वर्ष या ठिकाणी कोणतेही काम सुरू झाले नाही. आता आमच्या सरकारने या कामाला सुरुवात व्हावी, म्हणून प्रयत्न सुरू केले. ३३ वर्षांपासून या जिल्ह्यात उद्योग आलेला नाही. उद्योगधंदे निर्माण व्हावे, म्हणून आपण पुढाकार घेऊन दिल्लीत बैठक लावली होती. त्यानंतर या कामाला गती आली. आता काम सुरू होण्याची वेळ आली असताना त्यावेळी सत्तेत असलेले लोक आता प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मोर्च काढत आहेत, प्रकल्प नेमका कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विशेषत: एटापल्ली तालुक्यातील तरूणाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, कुशल मनुष्यबळ प्रकल्प उभा राहील त्यावेळपर्यंत निर्माण झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. कंपनी जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देण्यास तयार नसेल, तर मी एटापल्ली, हेडरी, सूरजागडच्या जनतेसोबत उभा राहील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.येत्या दहा दिवसात कंपनीचे अधिकारी, सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन साऱ्या बाबी निश्चित केल्या जातील, जनतेची दिशाभूल करण्याचे काम नेत्यांनी थांबविले पाहिजे व जिल्हा विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकसंघ उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)