शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड प्रकल्पाबाबत कंपनीशी लवकरच घेणार बैठक

By admin | Updated: April 22, 2016 03:20 IST

एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले आहे. करारनाम्यानुसार हे काम थांबविता येणार नाही, उद्या जर कंपनी न्यायालयात गेली तर कायमस्वरूपी हे काम प्रलंबित होऊन जाईल, त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका, येत्या दहा दिवसांत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावून सर्व बाबी समजावून घेतल्या जातील व प्रकल्प जिल्ह्यात उभा करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे प्रथम काम सरकार करेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २००७ मध्ये तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या खासगी कंपन्यांना सूरजागड पहाडीवर लीज मंजूर केली. तब्बल दहा वर्ष या ठिकाणी कोणतेही काम सुरू झाले नाही. आता आमच्या सरकारने या कामाला सुरुवात व्हावी, म्हणून प्रयत्न सुरू केले. ३३ वर्षांपासून या जिल्ह्यात उद्योग आलेला नाही. उद्योगधंदे निर्माण व्हावे, म्हणून आपण पुढाकार घेऊन दिल्लीत बैठक लावली होती. त्यानंतर या कामाला गती आली. आता काम सुरू होण्याची वेळ आली असताना त्यावेळी सत्तेत असलेले लोक आता प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मोर्च काढत आहेत, प्रकल्प नेमका कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विशेषत: एटापल्ली तालुक्यातील तरूणाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, कुशल मनुष्यबळ प्रकल्प उभा राहील त्यावेळपर्यंत निर्माण झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. कंपनी जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देण्यास तयार नसेल, तर मी एटापल्ली, हेडरी, सूरजागडच्या जनतेसोबत उभा राहील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.येत्या दहा दिवसात कंपनीचे अधिकारी, सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन साऱ्या बाबी निश्चित केल्या जातील, जनतेची दिशाभूल करण्याचे काम नेत्यांनी थांबविले पाहिजे व जिल्हा विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकसंघ उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)