शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नावर १९ ला बैठक

By admin | Updated: June 12, 2014 00:05 IST

नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले

गडचिरोली : नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले असून या खासदारांनी नुकतीच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची दिल्ली येथे भेट घेतली व विदर्भातील प्रलंबित रेल्वे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली.वडसा-गडचिरोली या प्रलंबित रेल्वे मार्ग व नागभीड-नागपूर रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी नागभीड येथे १९ जूनला दुपारी १२ वाजता नागपूर व बिलासपूर रेल्वे झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत रेल्वे मार्गाबाबत नागरिकांनी मुद्दे मांडावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. नागभीड-नागपूर या ब्राडगेज रेल्वे मार्गाला संपुआ २ सरकारच्या काळातच केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधीचा वाटा देण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यमंत्री मंडळानेही मंजुरी दिली होती. परंतु हे काम संपुआ सरकारने तातडीने मार्गी लावले नाही. त्यामुळे आता भाजपाच्या खासदारांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. तसेच मागील ३०-४० वर्षापासून रखडलेल्या वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षण कामालाही मंजुरी देण्यात आली होती. तत्कालिन रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण काम पूर्ण करून निविदा प्रक्रियेसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारला ५० टक्के वाटा द्यावयाचा आहे. ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. परंतु हे सर्व काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करतांना या भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानंतर आता दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, खा. हंसराज अहीर, खा. नाना पटोले, खा. रामदास तडस आदींनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा, अशी मागणी केली आहे. चंद्रपूर येथून मुंंबईसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणीही हंसराज अहीर यांनी यावेळी केली आहे यावेळी सदानंद गौडा यांनी विदर्भातील रेल्वेशी संबंधित सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. (शहर प्रतिनिधी)