शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

एकाच डॉक्टरच्या भरवशावर दवाखाना

By admin | Updated: November 17, 2014 22:52 IST

गडचिरोली जिल्ह्यात केवळ सरकारी आरोग्य सेवेच्या भरवशावरच नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. ४५ आरोग्य केंद्रात ९० डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी नक्षलग्रस्त

दुर्गम भागातील वास्तव : अनेक डॉक्टर सेवा बजाविण्यासाठी जातही नाहीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ सरकारी आरोग्य सेवेच्या भरवशावरच नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. ४५ आरोग्य केंद्रात ९० डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी नक्षलग्रस्त संवेदनशील भागात अनेक दवाखान्यांचा कारभार एकाच डॉक्टरच्या भरवशावर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन डॉक्टर शासनाने नियुक्त केले असले तरी १५ दिवस एक डॉक्टर व दुसरे १५ दिवस दुसरा डॉक्टर असा क्रम ठरवून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरू असल्याचे वास्तविक चित्र आहे.भामरागड तालुक्यात क्वचित डॉक्टर मुख्यालयी राहतात. आरमोरी तालुक्यातील दुर्गम भागातही अशीच परिस्थिती आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची या तालुक्यात वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ते शहरातून किंवा तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. काही डॉक्टर नागपुरात राहून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात सेवा देत आहेत. त्यांचा पगारही व्यवस्थीतपणे काढण्याचे पुण्यकर्म जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग करीत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे अनेक खास डॉक्टरांना जिल्हा मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. तसेच गट अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करा, असे स्पष्ट आदेश आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असतांनाही गडचिरोली जिल्ह्यात गट ब च्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट अ च्या दर्जाचे पद राजरोसपणे सांभाळण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे उडालेले आहे.अहेरी तालुक्याच्या कमलापूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नाही. आरमोरी तालुक्याच्या भाकरोंडी आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी नाही. अहेरी तालुक्यात अनेक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा ढासळलेली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात एकूण ४५ आरोग्य केंद्र आहेत. यात गडचिरोली तालुक्यात ४ आरमोरी ४, देसाईगंज ३, कुरखेडा ३, कोरची २, धानोरा ५, एटापल्ली ३, भामरागड ३, सिरोंचा ४, अहेरी ५, मुलचेरा ३ व चामोर्शी तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जि. प. आरोग्य विभागांतर्गत ३६ आरोग्य पथकांमध्ये प्रत्येकी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयुर्वेदिक दवाखाने ५, अ‍ॅलोपॅथीक दवाखाने २ असून या ठिकाणी प्रत्येकी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ३ मेडिकल मोबाईल युनिटमध्ये ३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जि. प. च्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर गट ‘ब’ चे ३८ व गट ‘अ’ चे २ असे एकूण ४० डॉक्टर अस्थायी म्हणून कार्यरत आहेत. नवसंजीवनी योजनेंतर्गत दुर्गम भागातील उपकेंद्राच्या ठिकाणी ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांना नवसंजीवनी योजनेतून ६ हजार व एनआरएचएमच्या निधीतून १२ हजार असे एकूण १८ हजार रूपये मानधन दिल्या जाते. जि. प. च्या आरोग्य विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात डॉक्टरांसह अन्यपदे रिक्त आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत एकूण १३६ डॉक्टर कार्यरत असले तरी बहुतांश डॉक्टर केवळ पगार मिळविण्यापुरतेच काम करीत असल्याचे दिसून येते. अनेक डॉक्टर गडचिरोली जिल्हा मुख्यालयी राहून दुर्गम भागात सेवारत आहे. त्यांचे आरोग्य केंद्राला दर्शन अमावस्या, पौर्णिमेसारखेच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)