शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

गटाच्या माध्यमातून यांत्रिक शेती

By admin | Updated: November 29, 2014 23:21 IST

शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला

गडचिरोली : शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला असल्याने शेतकरी गटांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती कसण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या भरवशावरच शेती केल्या जाते. परिणामी पिकांची लागवड वेळेवर होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट येत होती. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने प्राप्त केलेले यश बघून सहकार चळवळीच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे बचतगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार राज्यभर शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यांतर्गत सुमारे १ हजार ४५१ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. या शेतकरी गटांमध्ये १५ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचबरोबर समुहशक्तीच्या बळावर ती खरेदी करणेसुध्दा शक्य झाले आहे. शेतकरी गटातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने आवश्यक ते प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, शेतकरी अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन, शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य केले जात आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला मानव विकास मिशन अंतर्गत ३७ व आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १६ गट असे एकूण ५३ गट स्थापन करण्यात आले. या गटांना भात रोवणी यंत्र, पॉवर ट्रिलर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व रिपर आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत. इतरही गटांना लहान मोठी कृषी अवजारे पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांना फार मोठा हातभार लागत आहे. शेतीपुरक व्यवसाय म्हणून लाख शेती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये ८० गट स्थापन करण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)