शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
4
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
5
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
6
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
7
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
8
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
11
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
12
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
13
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
14
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
16
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
17
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
18
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
19
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
20
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?

प्रचंड मताधिक्यांनी अनेक उमेदवारांचा विजय

By admin | Updated: February 25, 2017 01:18 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी

अनेकांचे मताधिक्य आश्चर्यकारक : रमाकांत ठेंगरी, जगन्नाथ बोरकुटे व मनिषा गावडे दोन आकड्यांवर विजयी गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला आहे. केवळ जगन्नाथ बोरकुटे व रमाकांत ठेंगरी हे दोघेच अनुक्रमे ६६ व ८० मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. इतर विजयी उमेदवारांचे मताधिक्य तीन अंकी आकड्यांचेच असल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यातून काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. अनिल केरामी १२० तर सुमित्रा लोहंबरे २४५ मतांनी विजयी झाले. कुरखेडा तालुक्यात काँग्रेसचे प्रभाकर तुलावी २३१, भाजपचे नाजुकराव पुराम १४९, काँग्रेसचे प्रल्हाद कराडे ३८१, भाजपचे भाग्यवान टेकाम १ हजार ५८९ मतांनी निवडून आले आहेत. तर भाजपच्या गीता कुमरे ४१० मतांनी निवडून आल्या. देसाईगंज तालुक्यात रमाकांत ठेंगरी यांनी परसराम टिकले यांचा ८० मतांनी पराभव केला. तर नाना नाकाडे यांनी जीवन नाट यांचा १ हजार ५८ मतांनी पराभव केला. भाजपच्या रोशनी पारधी ४४९ मतांनी निवडून आल्या. आरमोरी तालुक्यात वैरागड-मानापूरवरून भाजपचे संपत आळे १ हजार ५ मतांनी निवडून आले आहे. तर काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर यांनी शिवसेनेच्या लक्ष्मी मने यांचा ५१३ मतांनी पराभव केला आहे. ठाणेगाव-इंजेवारीतून भाजपच्या मितलेश्वरी खोब्रागडे या तब्बल १ हजार २५ मतांनी निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या वनिता सहाकाटे ५४२ मतांनी निवडून आल्या आहेत. धानोरा तालुक्यातून भाजपच्या लता पुंगाटी १ हजार १२३, काँग्रेसचे मनोहर पोरेटी १ हजार ३८६, काँग्रेसचे अजिज जीवानी ५६९, काँग्रेसचे श्रीनिवास दुलमवार ७२२ मतांनी निवडून आले आहेत. गडचिरोली तालुक्यातून भाजपच्या निता साखरे ७६४, राकाँचे जगन्नाथ बोरकुटे ६६, रासपच्या वर्षा कौशीक ७२८, काँग्रेसचे अ‍ॅड. राम मेश्राम २५१ तर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी काँग्रेसच्या वैशाली ताटपल्लीवार तब्बल २ हजार ४७५ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपच्या रेखाताई डोळस व शिवसेनेच्या छाया कुंभारे यांचा पराभव केला आहे. चामोर्शी तालुक्यातून भाजपचे रमेश बारसागडे १ हजार ३१०, भाजपच्या योगीता भांडेकर १ हजार ४४४, भाजपच्या विद्या आभारे २ हजार ३१९, काँग्रेसच्या कविता भगत १ हजार २३६, ज्येष्ठ नेते अतुल गण्यारपवार १ हजार ६१४, भाजपच्या रंजीता कोडापे ६६५, भाजपचे नामदेवराव सोनटक्के १ हजार ७९, भाजपच्या शिल्पा रॉय २ हजार ४२, काँग्रेसच्या रूपाली पंदीलवार २२३ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुलचेरा तालुक्यातून राकाँचे युध्दिष्ठीर बिश्वास ४९२, काँग्रेसचे रविंद्र शहा ५५७, भाजपच्या माधुरी उरते ३१४ मतांनी विजयी झाल्या आहेत. उरते यांनी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या तनुश्री आत्राम यांचा पराभव केला आहे. एटापल्ली तालुक्यातून काँग्रेसचे संजय चरडुके ३०२, भाजपच्या कल्पना आत्राम १७३ तर ज्येष्ठ नेते सैनू मासू गोटा ५५९ मतांनी विजयी झाले आहेत. आदिवासी विद्यार्थी संघाच्या सारीका आईलवार २४१ मतांनी निवडून आल्या आहेत. भामरागड तालुक्यातून अ‍ॅड. लालसू सोमा नरोटे ४१६ मतांनी निवडून आल्या. तर ग्यानकुमारी टांगरू कौशी या ११३ मतांनी निवडून आल्या. अहेरी तालुक्यातून आविसंच्या सुनिता कुसनाके २७४, आविसंचे अजय कंकडालवार २ हजार ११३ मतांनी निवडून आले आहेत. कंकडालवार यांचे मताधिक्य जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. २०१२ मध्ये ते जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम १०२ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी नेहा रवींद्र आत्राम यांचा पराभव केला. पेरमिली-राजाराम क्षेत्रातून भाजपच्या मनिषा गावडे ८९ मतांनी विजयी झाल्या. तर आविसंचे अजय नैताम ४३६ मतांनी विजयी झाल्या आहेत. राकाँचे ऋषी पोरतेट १ हजार ६३० निवडून आले आहेत. सिरोंचा तालुक्यात आविसंच्या सरिता तैनेनी ४१६ मतांनी निवडून आल्या आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम ८७३ मतांनी निवडून आल्या आहेत. आविसंच्या जयसुधा जनगाम ६९५ मतांनी निवडून आल्या आहेत. भाजपच्या श्रीदेवी पांडवला या लक्ष्मीदेवीपेठा अंकिसा जि.प. क्षेत्रातून ३०८ मतांनी निवडून आल्या आहते. जिल्ह्यात जगन्नाथ बोरकुटे, रमाकांत ठेंगरी व मनिषा गावडे हे तीन उमेदवार केवळ दुहेरी आकड्यात निवडून आलेत. बाकी सर्व उमेदवार शंभरीच्या पार मताधिक्यांनी निवडून आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)