शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

प्रचंड मताधिक्यांनी अनेक उमेदवारांचा विजय

By admin | Updated: February 25, 2017 01:18 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी

अनेकांचे मताधिक्य आश्चर्यकारक : रमाकांत ठेंगरी, जगन्नाथ बोरकुटे व मनिषा गावडे दोन आकड्यांवर विजयी गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला आहे. केवळ जगन्नाथ बोरकुटे व रमाकांत ठेंगरी हे दोघेच अनुक्रमे ६६ व ८० मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. इतर विजयी उमेदवारांचे मताधिक्य तीन अंकी आकड्यांचेच असल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यातून काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. अनिल केरामी १२० तर सुमित्रा लोहंबरे २४५ मतांनी विजयी झाले. कुरखेडा तालुक्यात काँग्रेसचे प्रभाकर तुलावी २३१, भाजपचे नाजुकराव पुराम १४९, काँग्रेसचे प्रल्हाद कराडे ३८१, भाजपचे भाग्यवान टेकाम १ हजार ५८९ मतांनी निवडून आले आहेत. तर भाजपच्या गीता कुमरे ४१० मतांनी निवडून आल्या. देसाईगंज तालुक्यात रमाकांत ठेंगरी यांनी परसराम टिकले यांचा ८० मतांनी पराभव केला. तर नाना नाकाडे यांनी जीवन नाट यांचा १ हजार ५८ मतांनी पराभव केला. भाजपच्या रोशनी पारधी ४४९ मतांनी निवडून आल्या. आरमोरी तालुक्यात वैरागड-मानापूरवरून भाजपचे संपत आळे १ हजार ५ मतांनी निवडून आले आहे. तर काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर यांनी शिवसेनेच्या लक्ष्मी मने यांचा ५१३ मतांनी पराभव केला आहे. ठाणेगाव-इंजेवारीतून भाजपच्या मितलेश्वरी खोब्रागडे या तब्बल १ हजार २५ मतांनी निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या वनिता सहाकाटे ५४२ मतांनी निवडून आल्या आहेत. धानोरा तालुक्यातून भाजपच्या लता पुंगाटी १ हजार १२३, काँग्रेसचे मनोहर पोरेटी १ हजार ३८६, काँग्रेसचे अजिज जीवानी ५६९, काँग्रेसचे श्रीनिवास दुलमवार ७२२ मतांनी निवडून आले आहेत. गडचिरोली तालुक्यातून भाजपच्या निता साखरे ७६४, राकाँचे जगन्नाथ बोरकुटे ६६, रासपच्या वर्षा कौशीक ७२८, काँग्रेसचे अ‍ॅड. राम मेश्राम २५१ तर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी काँग्रेसच्या वैशाली ताटपल्लीवार तब्बल २ हजार ४७५ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपच्या रेखाताई डोळस व शिवसेनेच्या छाया कुंभारे यांचा पराभव केला आहे. चामोर्शी तालुक्यातून भाजपचे रमेश बारसागडे १ हजार ३१०, भाजपच्या योगीता भांडेकर १ हजार ४४४, भाजपच्या विद्या आभारे २ हजार ३१९, काँग्रेसच्या कविता भगत १ हजार २३६, ज्येष्ठ नेते अतुल गण्यारपवार १ हजार ६१४, भाजपच्या रंजीता कोडापे ६६५, भाजपचे नामदेवराव सोनटक्के १ हजार ७९, भाजपच्या शिल्पा रॉय २ हजार ४२, काँग्रेसच्या रूपाली पंदीलवार २२३ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुलचेरा तालुक्यातून राकाँचे युध्दिष्ठीर बिश्वास ४९२, काँग्रेसचे रविंद्र शहा ५५७, भाजपच्या माधुरी उरते ३१४ मतांनी विजयी झाल्या आहेत. उरते यांनी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या तनुश्री आत्राम यांचा पराभव केला आहे. एटापल्ली तालुक्यातून काँग्रेसचे संजय चरडुके ३०२, भाजपच्या कल्पना आत्राम १७३ तर ज्येष्ठ नेते सैनू मासू गोटा ५५९ मतांनी विजयी झाले आहेत. आदिवासी विद्यार्थी संघाच्या सारीका आईलवार २४१ मतांनी निवडून आल्या आहेत. भामरागड तालुक्यातून अ‍ॅड. लालसू सोमा नरोटे ४१६ मतांनी निवडून आल्या. तर ग्यानकुमारी टांगरू कौशी या ११३ मतांनी निवडून आल्या. अहेरी तालुक्यातून आविसंच्या सुनिता कुसनाके २७४, आविसंचे अजय कंकडालवार २ हजार ११३ मतांनी निवडून आले आहेत. कंकडालवार यांचे मताधिक्य जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. २०१२ मध्ये ते जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम १०२ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी नेहा रवींद्र आत्राम यांचा पराभव केला. पेरमिली-राजाराम क्षेत्रातून भाजपच्या मनिषा गावडे ८९ मतांनी विजयी झाल्या. तर आविसंचे अजय नैताम ४३६ मतांनी विजयी झाल्या आहेत. राकाँचे ऋषी पोरतेट १ हजार ६३० निवडून आले आहेत. सिरोंचा तालुक्यात आविसंच्या सरिता तैनेनी ४१६ मतांनी निवडून आल्या आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम ८७३ मतांनी निवडून आल्या आहेत. आविसंच्या जयसुधा जनगाम ६९५ मतांनी निवडून आल्या आहेत. भाजपच्या श्रीदेवी पांडवला या लक्ष्मीदेवीपेठा अंकिसा जि.प. क्षेत्रातून ३०८ मतांनी निवडून आल्या आहते. जिल्ह्यात जगन्नाथ बोरकुटे, रमाकांत ठेंगरी व मनिषा गावडे हे तीन उमेदवार केवळ दुहेरी आकड्यात निवडून आलेत. बाकी सर्व उमेदवार शंभरीच्या पार मताधिक्यांनी निवडून आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)