शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दहाव्या दिवशी उघडली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देनऊ दिवसांचा जनता कर्फ्यू : कोरचीत नागरिक, व्यापारी व संघटनांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरचीतील नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरचीवासीयांनी तब्बल नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. नऊ दिवस चांगला प्रतिसाद मिळाला व सोमवारी १० व्या दिवशी कोरचीतील संपूर्ण बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम ठरविले असताना बाहेरगावाहून अपडाऊन करणारे अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. शहरातील नागरिकांनी अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच चार दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांची बैठकही झाली होती. यामध्ये बाहेर गावातील व्यापारी कोरची शहरात येऊन काही ठिकाणी चारचाकी वाहनातून किराणा व भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले होते. यावर व्यापारी संघटनेने कडक निर्बंध लाऊन बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांना हाकलून लावण्यात आले. त्यानंतर बाहेरून येणारे व्यापारी बंद झाले. अशा स्थितीतही कोरची येथील नागरिकांनी जनता कर्फ्यू यशस्वी केला. आता बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.गर्दी टाळून नियमांचे पालन करा-तहसीलदारकोरची शहरात नऊ दिवसानंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. परंतु वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. ग्रामीण भागातूनही अनेक नागरिक दाखल झाले. कोरोना विषाणूचे संकट कायम असताना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तेव्हाच नऊ दिवस ठेवलेल्या जनता कर्फ्यूचे महत्त्व राहिल. गर्दी टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार व आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांना केले आहे.