शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

दहाव्या दिवशी उघडली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे.

ठळक मुद्देनऊ दिवसांचा जनता कर्फ्यू : कोरचीत नागरिक, व्यापारी व संघटनांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरचीतील नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरचीवासीयांनी तब्बल नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. नऊ दिवस चांगला प्रतिसाद मिळाला व सोमवारी १० व्या दिवशी कोरचीतील संपूर्ण बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम ठरविले असताना बाहेरगावाहून अपडाऊन करणारे अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. शहरातील नागरिकांनी अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच चार दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांची बैठकही झाली होती. यामध्ये बाहेर गावातील व्यापारी कोरची शहरात येऊन काही ठिकाणी चारचाकी वाहनातून किराणा व भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले होते. यावर व्यापारी संघटनेने कडक निर्बंध लाऊन बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांना हाकलून लावण्यात आले. त्यानंतर बाहेरून येणारे व्यापारी बंद झाले. अशा स्थितीतही कोरची येथील नागरिकांनी जनता कर्फ्यू यशस्वी केला. आता बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.गर्दी टाळून नियमांचे पालन करा-तहसीलदारकोरची शहरात नऊ दिवसानंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. परंतु वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. ग्रामीण भागातूनही अनेक नागरिक दाखल झाले. कोरोना विषाणूचे संकट कायम असताना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तेव्हाच नऊ दिवस ठेवलेल्या जनता कर्फ्यूचे महत्त्व राहिल. गर्दी टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार व आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांना केले आहे.