शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

भामरागडातील बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:25 IST

सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही ...

सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने १२८ गावांतील नागरिकांशी थेट संबंधित भामरागड बाजारपेठ अजूनही बंद आहे.

भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवरील ठेंगण्या पुलामुळे पावसाळ्यात वारंवार संपर्क तुटत होता. त्यामुळे उंच पुलाची मागणी फार वर्षांपासून होत होती. सदर पूल मंजूर होऊन बांधकामास सुरुवात झाली. मात्र यामध्ये काही व्यापाऱ्यांची दुकाने व घरे पूर्णपणे जाणार आहे. तसेच रस्ते बांधकाम मोठ्या धरणासारखे होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला असलेली दुकाने बेकामी होऊन फार मोठे नुकसान होणार आहे.

पूल व रस्त्याला विरोध नसून अनेक वर्षांपासून घरे बांधून राहतात, त्यांच्या घरांची नुकसानभरपाई व पर्यायी जागा द्यावी, दुकान लाइन एकत्र मार्केट बसविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी, या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांकडून सोमवारपासून दुकाने बंद ठेवून धरणे आंदाेलन करण्यात येत आहे. सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मात्र प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही.

काही नेतेमंडळींनी भेट दिली. वरिष्ठांना सांगून समस्या सोडवु, असे आश्वासन मिळत आहे. पण प्रत्यक्षात कोणतीही कृती होताना दिसत नाही. या आंदाेलनात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, सहसचिव आसीफ सुफी, संदीप मोगरे, मनोज मंडल, अरण बोस, बबलू शेख, प्रदीप करमाकार, सुरेश कोडापे, शकील शेख, सुजित डे, संतोष मद्दर्लेवार, बहादूर आत्राम अन्य पदाधिकारी व दुकानदार सहभागी झाले आहेत.

(बॉक्स)

प्रशासन म्हणते, मालकी हक्क देता येत नाही

वनविभागाच्या जागेवर असल्याने आम्हाला मालकी हक्क देता येत नाही. वनविभागानेसुध्दा आमच्याकडे जागा नाही म्हणून जागा खाली सोडून दिली. तालुका घोषित झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील सुशिक्षित बेरोजगार रोजगार शोधत खुल्या जागेत दुकान मांडून उदरनिर्वाह करीत आहेत. झोपडीचे रूपांतर घरात झाले. काेणी पक्के घरे बांधले, तर कोणी दुमजली बिल्डिंग बनवतानाही कोणी हरकत घेतली नाही. आता कुठून आले वनविभाग, घरे काढण्यासाठी नाहरकत देणार कोण, गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून इथे राहत आहोत तर मालकी हक्क कोण देणार, शासन की, प्रशासन, असे अनेक प्रश्न व्यापारी व नागरिक करीत आहेत. तालुकानिर्मिती झाल्यापासून रोजगारासाठी येऊन इथे झोपडीत राहात होतो, तेव्हा मतदान ओळखपत्र बनवले. जेव्हा मतदान करताना आम्हाला पुराव्याची गरज पडली नाही असे व्यापारी सांगतात.

(बाॅक्स)

संदीप कोरेत यांनी दिली भेट

भामरागड येथील त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या धरणे आंदोलनाला भाजपचे जिल्हा सचिव संदीप कोरेत यांनी भेट दिली. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भामरागडातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या मांडणार, असे आश्वासन संदीप कोरेत यांनी दिले. यावेळी वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी संघ संयोजक अमित बेजलवार, अहेरी पं. स.चे सभापती भास्कर तलांडी आदी हजर होते.