शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

संततधार पावसाने अनेक गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:26 IST

मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.

ठळक मुद्देअनेक ठिकाणचा वीज प्रवाह खंडित : शेकडो गावे अंधारात; नदी-नाल्यांच्या पुरामुळे वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत होता. अशातच शुक्रवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गेल्या दोन दिवसात धान रोवणीच्या कामांना गती आली आहे. तसेच नदी, नाले ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.जिल्ह्यातील नदी व नाले जंगलातून वाहतात. जंगलातील पूर्ण पाणी नदी, नाल्यांमध्ये येते. काही नदी व नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून काही ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.सोमवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. त्यामुळे मंगळवारीही नदी, नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.आष्टी : आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली नाला आहे. या नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. सोमवारी या नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.कमलापूर : कमलापूर-दामरंचा मार्गावर सोमवारी कमलापूर पासून तीन किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागले.अंकिसा : गडचिरोली जिल्ह्यासह सिरोंचा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सततच्या पावसामुळे बालमुत्यमपल्लीजवळील येर्रावागू नाला ओसंडून वाहत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.वैरागड : पावसामुळे रोवण्याच्या कामांना गती आली आहे. सती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सदर नदी दुथडी भरून वाहत आहे. सखल भागात पाणी साचले आहे.अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पलिकडेच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे.भामरागड तालुक्यातील दुरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. भामरागड तालुका तिन्ही बाजुने नद्यांनी वेढला आहे. पूर परिस्थितीत या तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवा सुरू असणे आवश्यक असतानाही आवश्यक वेळीच दुरध्वनी सेवा ठप्प पडली आहे.