शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संततधार पावसाने अनेक गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:26 IST

मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.

ठळक मुद्देअनेक ठिकाणचा वीज प्रवाह खंडित : शेकडो गावे अंधारात; नदी-नाल्यांच्या पुरामुळे वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, भामरागडसह अनेक ठिकाणचा वीज प्रवाह पूर्णपणे खंडीत असल्यामुळे शेकडो गावे अंधारात आहेत.धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट बघत होता. अशातच शुक्रवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गेल्या दोन दिवसात धान रोवणीच्या कामांना गती आली आहे. तसेच नदी, नाले ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली आहे.जिल्ह्यातील नदी व नाले जंगलातून वाहतात. जंगलातील पूर्ण पाणी नदी, नाल्यांमध्ये येते. काही नदी व नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून काही ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.सोमवारी दिवसभर व रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. त्यामुळे मंगळवारीही नदी, नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.आष्टी : आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली नाला आहे. या नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. सोमवारी या नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.कमलापूर : कमलापूर-दामरंचा मार्गावर सोमवारी कमलापूर पासून तीन किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आल्यापावली परत जावे लागले.अंकिसा : गडचिरोली जिल्ह्यासह सिरोंचा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सततच्या पावसामुळे बालमुत्यमपल्लीजवळील येर्रावागू नाला ओसंडून वाहत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.वैरागड : पावसामुळे रोवण्याच्या कामांना गती आली आहे. सती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सदर नदी दुथडी भरून वाहत आहे. सखल भागात पाणी साचले आहे.अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पलिकडेच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे.भामरागड तालुक्यातील दुरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. भामरागड तालुका तिन्ही बाजुने नद्यांनी वेढला आहे. पूर परिस्थितीत या तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे भ्रमणध्वनी व दुरध्वनी सेवा सुरू असणे आवश्यक असतानाही आवश्यक वेळीच दुरध्वनी सेवा ठप्प पडली आहे.