शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अनुसूचित क्षेत्रात यापुढे अनेक पदांवर स्थानिक आदिवासींचीच भरती होणार

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी

गडचिरोली : राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागातील आदिवासी तरूणांना अनुसूचित क्षेत्रातील नोकऱ्यासाठी दावा करता येणार नाही. राज्यात अनुसूचित क्षेत्रात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु या भागाचा अजुनही पुरेसा विकास झालेला नाही. या विभागातील मानव विकास निर्देशांक व सामाजिक निर्देशांक राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. कर्मचाऱ्याची पदे रिक्त राहणे, सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती कमी असणे, कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसणे या आणि इतर कारणांमुळे शिक्षण, आरोग्य व इतर सेवांपासून आदिवासी समाज अजुनही वंचित राहिला आहे, असे आढळून आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेनेही आदिवासी समाजाच्या विविध समस्या राज्यपालांच्या निर्देशनास आणून दिल्या होत्या. राज्य सरकारच्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काही शासकीय पदे जी स्थानिक आदिवासीमधूनच भरली जावीत, अशी शिफारस परिषदेने राज्यपालांना केली होती. त्यानुसार घटनेच्या पाचव्या अनुसूचीद्वारे प्राप्त झालेल्या विशेषाधिकारांचा वापर करून राज्यपालांनी तलाठी, ग्रामसेवक, सर्व्हेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरिक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासह गट क आणि ड वर्गातील समकक्ष पदे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी उमेदवारांमधूनच भरण्यात येतील, असा निर्णय घेतला व तशी अधिसूचना जारी करण्यात आली. राज्यपालांनी अशा प्रकारच्या घटनात्मक विशेष अधिकाराचा पहिल्यांदाच वापर केला असून या निणर्यामुळे आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्ग समाजातील उमेदवारांचे नोकरीचे दार बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आधीच ओबीसी समाजाला आरक्षणात कपात झाल्याने मोठा फटका बसला आहे. त्यात आता नवा निर्णय झाल्याने आता तर इतर मागासवर्गीयांचा असंतोष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)