शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अनुसूचित क्षेत्रात यापुढे अनेक पदांवर स्थानिक आदिवासींचीच भरती होणार

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी

गडचिरोली : राज्यातील अनुसूचित क्षेत्रात यापुढे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य व कृषी कर्मचारी आदी पदे स्थानिक आदिवासी समाजातील उमेदवारामधून भरली जातील, असा महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागातील आदिवासी तरूणांना अनुसूचित क्षेत्रातील नोकऱ्यासाठी दावा करता येणार नाही. राज्यात अनुसूचित क्षेत्रात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु या भागाचा अजुनही पुरेसा विकास झालेला नाही. या विभागातील मानव विकास निर्देशांक व सामाजिक निर्देशांक राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. कर्मचाऱ्याची पदे रिक्त राहणे, सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती कमी असणे, कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसणे या आणि इतर कारणांमुळे शिक्षण, आरोग्य व इतर सेवांपासून आदिवासी समाज अजुनही वंचित राहिला आहे, असे आढळून आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार परिषदेनेही आदिवासी समाजाच्या विविध समस्या राज्यपालांच्या निर्देशनास आणून दिल्या होत्या. राज्य सरकारच्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काही शासकीय पदे जी स्थानिक आदिवासीमधूनच भरली जावीत, अशी शिफारस परिषदेने राज्यपालांना केली होती. त्यानुसार घटनेच्या पाचव्या अनुसूचीद्वारे प्राप्त झालेल्या विशेषाधिकारांचा वापर करून राज्यपालांनी तलाठी, ग्रामसेवक, सर्व्हेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरिक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासह गट क आणि ड वर्गातील समकक्ष पदे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी उमेदवारांमधूनच भरण्यात येतील, असा निर्णय घेतला व तशी अधिसूचना जारी करण्यात आली. राज्यपालांनी अशा प्रकारच्या घटनात्मक विशेष अधिकाराचा पहिल्यांदाच वापर केला असून या निणर्यामुळे आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या निर्णयामुळे इतर मागास प्रवर्ग समाजातील उमेदवारांचे नोकरीचे दार बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आधीच ओबीसी समाजाला आरक्षणात कपात झाल्याने मोठा फटका बसला आहे. त्यात आता नवा निर्णय झाल्याने आता तर इतर मागासवर्गीयांचा असंतोष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)