शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअहेरीत कडकडीत बंद : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/देसाईगंज/आष्टी/आरमोरी : कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गडचिरोली शहरानंतर अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली. मात्र गडचिरोली शहर आणि अहेरी वगळता अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत दुमत बनत असल्यामुळे काही ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी या निर्णयातून माघार घेतली आहे.२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसऱ्याही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.बाजारपेठ बंद असल्याने अहेरी शहरातील वाहनांची वर्दळ कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. गर्दी कमी झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. केवळ आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.आरमोरीत संमिश्र प्रतिसादआरमोरी येथील बाजारपेठ २८ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी आरमोरी शहरातील बाजारपेठ साप्ताहित बंद राहते. मंगळवारी आरमोरीतील मोठी दुकाने सकाळपासूनच बंद होती. मात्र लहान दुकानदारांनी दुकाने सुरू केली. दुपारी २ वाजतानंतर संपूर्ण दुकाने बंद करण्यात आली. आरमोरीत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत अनेक गट पडले आहेत.देसाईगंज व आष्टीतील जनता कर्फ्यू मागेदेसाईगंज शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे बंदबाबत दुकानदारांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी व्यापारी, दुकानदार, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांची सिंधू भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुतांश दुकानदारांनी बंदला कडाडून विरोध केला. त्यामुळे मंगळवारपासून बंद मागे घेण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सराफा दुकानदारांनी मात्र दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, हार्डवेअर, भांडे दुकानदारांसह कापड व्यावसायिक असोसिएशनने दि.४ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठाणी यांनी सांगितले. तर असोसिएशनमध्ये नसलेल्या व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापड व्यावसायिक हरिष मोटवानी यांनी सांगितले.आष्टी येथील व्यापारी मंडळाच्या सदस्यांनी ३० सप्टेंबर ७ ऑक्टोबर या कालावधीत बंद पाळण्याचे ठरविले होते. याबाबत चामोर्शीचे तहसीलदार यांना निवेदन सुध्दा दिले होते. मात्र काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुन्हा मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ३० सप्टेंबरपासून आष्टी येथील दुकाने पूर्ववत सुरू राहतील. आष्टी येथे कोरोना रूग्णांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर बंद लादणे चुकीचे होईल, याचा विचार करीत बंद मागे घेण्यात आला, असे व्यापारी संघटनेने कळविले आहे. बैठकीला पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल, सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी, बिराजदार हजर होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या