शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअहेरीत कडकडीत बंद : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/देसाईगंज/आष्टी/आरमोरी : कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गडचिरोली शहरानंतर अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली. मात्र गडचिरोली शहर आणि अहेरी वगळता अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत दुमत बनत असल्यामुळे काही ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी या निर्णयातून माघार घेतली आहे.२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसऱ्याही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.बाजारपेठ बंद असल्याने अहेरी शहरातील वाहनांची वर्दळ कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. गर्दी कमी झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. केवळ आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.आरमोरीत संमिश्र प्रतिसादआरमोरी येथील बाजारपेठ २८ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी आरमोरी शहरातील बाजारपेठ साप्ताहित बंद राहते. मंगळवारी आरमोरीतील मोठी दुकाने सकाळपासूनच बंद होती. मात्र लहान दुकानदारांनी दुकाने सुरू केली. दुपारी २ वाजतानंतर संपूर्ण दुकाने बंद करण्यात आली. आरमोरीत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत अनेक गट पडले आहेत.देसाईगंज व आष्टीतील जनता कर्फ्यू मागेदेसाईगंज शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे बंदबाबत दुकानदारांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी व्यापारी, दुकानदार, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांची सिंधू भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुतांश दुकानदारांनी बंदला कडाडून विरोध केला. त्यामुळे मंगळवारपासून बंद मागे घेण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सराफा दुकानदारांनी मात्र दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, हार्डवेअर, भांडे दुकानदारांसह कापड व्यावसायिक असोसिएशनने दि.४ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठाणी यांनी सांगितले. तर असोसिएशनमध्ये नसलेल्या व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापड व्यावसायिक हरिष मोटवानी यांनी सांगितले.आष्टी येथील व्यापारी मंडळाच्या सदस्यांनी ३० सप्टेंबर ७ ऑक्टोबर या कालावधीत बंद पाळण्याचे ठरविले होते. याबाबत चामोर्शीचे तहसीलदार यांना निवेदन सुध्दा दिले होते. मात्र काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुन्हा मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ३० सप्टेंबरपासून आष्टी येथील दुकाने पूर्ववत सुरू राहतील. आष्टी येथे कोरोना रूग्णांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर बंद लादणे चुकीचे होईल, याचा विचार करीत बंद मागे घेण्यात आला, असे व्यापारी संघटनेने कळविले आहे. बैठकीला पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल, सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी, बिराजदार हजर होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या