शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

निकालाने अनेकांना बसले तडाखे; शिवसेना नामशेष

By admin | Updated: February 24, 2017 00:56 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत अस्थिर स्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाने मिळविले जोरदार यशगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत अस्थिर स्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर गेल्या निवडणुकीच्या जागा कायम राखण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने यश मिळविला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना मोठा तडाखा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाने दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही अहेरी विधानसभा जनतेने नाकारले असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा व नगर पालिका निवडणुकीच्या निकालात भाजपचा असलेला विजयाचा रथ काही अंशी जिल्हा परिषद निवडणुकीने रोखला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आशा बाळगली जात होती. मात्र भारतीय जनता पक्ष बहुमतापासून काही जागा दूर आहे. भाजपला आरमोरी विधानसभा क्षेत्रात नऊ जागांवर तर काँग्रेसला पाच जागांवर यश मिळाले आहे. या भागातून शिवसेना संपूर्णत: नामशेष झाली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात धानोराचा गड कायम राखण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. तालुक्यातील मुस्का-मुरूमगाव जागा वगळता संपूर्ण तिन्ही जागा काँग्रेसने कायम राखले आहे. गडचिरोली तालुक्यात काँग्रेसने दोन जागा नव्याने पदरात पाडले आहे. गेल्यावेळी या तालुक्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यावेळी अ‍ॅड. राम मेश्राम व वैशाली किरण ताटपल्लीवार निवडून आल्या आहेत. हे दोन्ही विजयी उमेदवार विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. एटापल्ली, मुलचेरा, कोरची व चामोर्शी तालुक्यातही यावेळी काँग्रेसने नव्याने खाते उघडले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्यावेळी दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी कॉग्रेस तेथून हद्दपार झाली आहे. मात्र काँग्रेस गेल्यावर्षीच्या जागा कायम राखण्यात यशस्वी झाली. हे काँग्रेसचे मोठे यश आहे. खासदार अशोक नेते यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा पराभव झाल्याने भाजपच्या वर्तुळातही अनेकांना आनंद आहे. डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचा गड राखण्यात यश मिळविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे खासदार आमदार व मंत्री सत्ता स्थापन करण्यासाठी कसा प्रयत्न करतात. हे आता लवकरच दिसून येईल.