शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अनेक महा-ई-सेवा केंद्र बंद, नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST

कोणाचे सहा महिन्यांकरिता तर कोणाचे कायमचे बंद करण्यात आले. विविध कारणांस्तव केंद्र बंद करण्यात आले. लोकेशनवर आयडी सुरू नसणे, ...

कोणाचे सहा महिन्यांकरिता तर कोणाचे कायमचे बंद करण्यात आले. विविध कारणांस्तव केंद्र बंद करण्यात आले. लोकेशनवर आयडी सुरू नसणे, अधिकचे पैसे आकारणे या कारणांमुळे महा-ई-केंद्र बंद करण्यात आले. वास्तविक पाहता शासनाच्या नियमानुसार शुल्क आकारणे ई-सेवा केंद्राच्या कुठल्याही केंद्रचालकाला शक्य नाही कारण केंद्र चालवण्यासाठी घरभाडे द्यावे लागते. इंटरनेटचे पैसे, विद्युतबिल भरणे, पेपर घेणे प्रिंट काढणे, स्कॅन करणे, ऑपरेटरला मानधन देणे असे अनेक प्रकारचे खर्च सांभाळावे लागतात. हा सर्व खर्च भागवून कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा करावा लागतो. यामुळे वीस ते तीस रुपये अधिकचे पैसे हे प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रचालक घेतात, परंतु अशा परिस्थितीत अनेक जणांचे आयडी बंद झाल्याने आता अनेक जण दुसऱ्यांच्या आयडीवर काम करून जनतेचे आर्थिक लूट करत आहेत, हे या प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाॅक्स :

बोगस आयडी वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई नाही

ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्याकडेसुद्धा महा-ई-सेवा केंद्र आयडी असते व त्यांना शासनातर्फे मानधनसुद्धा दिले जाते, परंतु त्यांनी मुख्यालय राहतच नाही. त्यांचे आयडी दुसऱ्यांना देऊन त्यांच्याकडून कमिशन घेत असतात. ज्यांच्याकडे महा-ई-सेवा केंद्र परवाना नसलेल्या व्यक्ती दुसऱ्याच्या नावाच्या आयडीचे वापर करून कास्ट सर्टिफिकेट असो किंवा अन्य कागदपत्र असो बनवीत असताना पुराव्यावर व्हाइटनर लावून झेरॉक्स काढून त्यावर जो व्यक्ती कास्ट काढण्यासाठी येतो, त्यांच्या पुराव्याचा उल्लेख करून अपलोड करतो यामुळे अनेक जणांचे बोगस प्रमाणपत्र उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांच्यावर कारवाई होते, परंतु ज्यांच्याकडे परवाना नाही, बोगस आयडी वापरून काम करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई का होत नाही? एकाची आयडी दुसऱ्याला देणे ही बाब अवैध आहे, परंतु असे प्रकार अनेक दुर्गम भागात सर्रासपणे होत आहे.