शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोरोनामुळे अनेकांनी शोधला नवीन रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे हाल झाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठ सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक व मजूर वर्ग करीत होता.

ठळक मुद्देकाळाची गरज ओळखली : लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये अनेकांचे रोजगार बंद पडले. छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले. या संकटातूनच मार्ग शोधताना अनेकांनी आपला जुना व्यवसाय बदलवून नवीन व्यवसायाला सुरूवात केली असल्याचे चित्र गडचिरोलीसह तालुकास्तरावरील शहरांमध्ये दिसून येत आहे.लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे हाल झाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठ सुरू होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक व मजूर वर्ग करीत होता. मात्र पुन्हा केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. सुमारे ४० दिवसांचा रोजगार गेल्यास जगायचे कसे, असा प्रश्न लहान व्यावसायिकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे या व्यावसायिकांनी स्वत:चा व्यवसाय बदलवून लॉकडाऊनच्या कालावधीतही जो व्यवसाय करणे शक्य आहे, असे व्यवसाय करण्यास सुरूवात केली आहे.भाजीपाला विक्री, दुध, ब्रेड, फळे विक्री अजुनही सुरू आहे. स्वत:च्या पारंपारिक व्यवसाय सोडून त्याच ठिकाणी आता दुसरा व्यवसाय सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. नवीन व्यवसाय सुरू केला असला तरी दुकाने सुरू ठेवण्याची मर्यादा केवळ १ वाजेपर्यंत आहे. तसेच कोरोनाच्या भितीमुळे नागरिक फारसे बाहेर निघत नाही. परिणामी नवीन व्यवसायातून फारसे उत्पन्न मिळत नाही. मात्र या नवीन रोजगाराने त्यांच्या घरची चूल पेटविण्यास निश्चितच मदत झाली आहे. लॉकडाऊन कधी हटणार याची प्रतीक्षा जिल्हाभरातील व्यावसायिक करीत आहेत.जोखीम उचलण्याची प्रेरणाआजपर्यंत अनेकांनी आपला पारंपारिक व्यवसायच करण्याला प्राधान्य दिले होते. जुन्या व्यवसायातून भलेही कमी कमाई होत असेल मात्र हे व्यावसायिक त्याच व्यवसायाला चिकटून होते. मात्र कोरोनामुळे त्यांना नवीन व्यवसायांचा शोध घेण्यास भाग पाडले. सुरूवातीला नवीन व्यवसाय करताना अडचणी येत होत्या. मात्र नवीन व्यवसायातील बारकावे, त्रुट्या लक्षात आल्यानंतर त्यावर मात करण्याची कुवत दुकानदाराने निर्माण केली आहे. व्यवसाय बदलण्याची जोखीम या दुकानदारांनी उचलली आहे. काही दुकानदारांना नवीन व्यवसायातून जुन्या व्यवसायापेक्षा अधिक नफा मिळत असल्याने त्याच व्यवसायात स्थिरावण्याची शक्यता आहे.आपला पूर्वी पुजा साहित्य विक्रीचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर गंडातर आले. कुटुंब चालविण्यासाठी काहीना काही रोजगार करणे आवश्यक आहे. शासनाने ब्रेड, बिस्कीट विक्रीला अत्यावश्यक सेवेत समावेश केले आहे. काळाची गरज ओळखून आपण आता ब्रेड विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातूनही थोडीफार कमाई होत आहे.- शब्बीर खान महेबूब पठाण, दुकानदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय