शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

By admin | Updated: April 25, 2015 01:41 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला.

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री शासनाने नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने या ग्रामपंचायतसाठीचे मतदान रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांना लाखो रूपयाने चुना लागल्याचे चित्र जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी मतदान असल्याने गुरूवारच्या रात्री अनेक तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या पेट्या खुल्या केल्या होत्या व मतदारांना पैसे वाटण्याचे कामही कार्यकर्त्यांमार्फत सुरू केले होते. मात्र रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला ग्रामीण विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले असल्याचा आदेश प्राप्त झाला व या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्या. एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आदी तालुका मुख्यालयात मतदानासाठी गेलेले पोलिंग पथकही परत आले. सरकारच्या या आदेशामुळे अनेक उमेदवार आर्थिक अडचणीत आले आहे. पहिल्या टप्प्यात सिरोंचा रै., सिरोंचा माल, अहेरी, एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा या तालुका मुख्यालयाची निवडणूक रद्द झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एटापल्लीत रात्री साडेअकराला पोहोचली बातमीएटापल्ली तालुका मुख्यालयाच्या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या १४ जागांवर २४ एप्रिलला मतदान होणार होते. ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीचा प्रचार अत्यंत चुरशीचा झाला. मात्र शुक्रवारी मतदान होणार असल्याने गुरूवारी रात्रीपासूनच सर्व उमेदवारांनी सर्व वार्डांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाला एटापल्ली ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे, अशी सूचना आली अन् उमेदवारांची तारांबळ उडाली. नामांकन पत्र दाखल केल्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हजारो रूपयांचा खर्च या ५० उमेदवारांनी केला. त्यांच्या सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, अशीच परिस्थिती चामोर्शी याही तालुका मुख्यालयात दिसून आली. येथे दोन उमेदवार ग्रामपंचायतसाठी अविरोध निवडून आले होते. इतर जागांवर मोठी चुरस होती. अनेक दिग्गजांनी येथे प्रचार यंत्रणा राबविली. मात्र त्यांच्याही पदरी या निर्णयाने निराशा आली आहे. एकूणच आनंदापेक्षा दु:खाचे वातावरण तालुका मुख्यालयांमध्ये दिसून आले.