शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

By admin | Updated: April 25, 2015 01:41 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला.

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री शासनाने नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने या ग्रामपंचायतसाठीचे मतदान रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांना लाखो रूपयाने चुना लागल्याचे चित्र जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी मतदान असल्याने गुरूवारच्या रात्री अनेक तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या पेट्या खुल्या केल्या होत्या व मतदारांना पैसे वाटण्याचे कामही कार्यकर्त्यांमार्फत सुरू केले होते. मात्र रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला ग्रामीण विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले असल्याचा आदेश प्राप्त झाला व या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्या. एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आदी तालुका मुख्यालयात मतदानासाठी गेलेले पोलिंग पथकही परत आले. सरकारच्या या आदेशामुळे अनेक उमेदवार आर्थिक अडचणीत आले आहे. पहिल्या टप्प्यात सिरोंचा रै., सिरोंचा माल, अहेरी, एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा या तालुका मुख्यालयाची निवडणूक रद्द झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एटापल्लीत रात्री साडेअकराला पोहोचली बातमीएटापल्ली तालुका मुख्यालयाच्या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या १४ जागांवर २४ एप्रिलला मतदान होणार होते. ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीचा प्रचार अत्यंत चुरशीचा झाला. मात्र शुक्रवारी मतदान होणार असल्याने गुरूवारी रात्रीपासूनच सर्व उमेदवारांनी सर्व वार्डांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाला एटापल्ली ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे, अशी सूचना आली अन् उमेदवारांची तारांबळ उडाली. नामांकन पत्र दाखल केल्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हजारो रूपयांचा खर्च या ५० उमेदवारांनी केला. त्यांच्या सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, अशीच परिस्थिती चामोर्शी याही तालुका मुख्यालयात दिसून आली. येथे दोन उमेदवार ग्रामपंचायतसाठी अविरोध निवडून आले होते. इतर जागांवर मोठी चुरस होती. अनेक दिग्गजांनी येथे प्रचार यंत्रणा राबविली. मात्र त्यांच्याही पदरी या निर्णयाने निराशा आली आहे. एकूणच आनंदापेक्षा दु:खाचे वातावरण तालुका मुख्यालयांमध्ये दिसून आले.