शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

By admin | Updated: April 25, 2015 01:41 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला.

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री शासनाने नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने या ग्रामपंचायतसाठीचे मतदान रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांना लाखो रूपयाने चुना लागल्याचे चित्र जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी मतदान असल्याने गुरूवारच्या रात्री अनेक तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या पेट्या खुल्या केल्या होत्या व मतदारांना पैसे वाटण्याचे कामही कार्यकर्त्यांमार्फत सुरू केले होते. मात्र रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला ग्रामीण विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले असल्याचा आदेश प्राप्त झाला व या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्या. एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आदी तालुका मुख्यालयात मतदानासाठी गेलेले पोलिंग पथकही परत आले. सरकारच्या या आदेशामुळे अनेक उमेदवार आर्थिक अडचणीत आले आहे. पहिल्या टप्प्यात सिरोंचा रै., सिरोंचा माल, अहेरी, एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा या तालुका मुख्यालयाची निवडणूक रद्द झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एटापल्लीत रात्री साडेअकराला पोहोचली बातमीएटापल्ली तालुका मुख्यालयाच्या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या १४ जागांवर २४ एप्रिलला मतदान होणार होते. ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीचा प्रचार अत्यंत चुरशीचा झाला. मात्र शुक्रवारी मतदान होणार असल्याने गुरूवारी रात्रीपासूनच सर्व उमेदवारांनी सर्व वार्डांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाला एटापल्ली ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे, अशी सूचना आली अन् उमेदवारांची तारांबळ उडाली. नामांकन पत्र दाखल केल्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हजारो रूपयांचा खर्च या ५० उमेदवारांनी केला. त्यांच्या सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, अशीच परिस्थिती चामोर्शी याही तालुका मुख्यालयात दिसून आली. येथे दोन उमेदवार ग्रामपंचायतसाठी अविरोध निवडून आले होते. इतर जागांवर मोठी चुरस होती. अनेक दिग्गजांनी येथे प्रचार यंत्रणा राबविली. मात्र त्यांच्याही पदरी या निर्णयाने निराशा आली आहे. एकूणच आनंदापेक्षा दु:खाचे वातावरण तालुका मुख्यालयांमध्ये दिसून आले.