शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मलेरिया नियंत्रणात

By admin | Updated: November 6, 2016 01:27 IST

आरोग्य विभागाने केलेल्या विविध उपाययोजना व वातावरणाची साथ मिळाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत

मागील वर्षीच्या तुलनेत : पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड घटलीगडचिरोली : आरोग्य विभागाने केलेल्या विविध उपाययोजना व वातावरणाची साथ मिळाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरिया नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडे असलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. या जिल्ह्यात पर्जन्यमानही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. धानाची शेती केली जाते. धानाच्या बांधीत रोवणीपासून ते धान कापणीपर्यंत पाणी साचून राहते. धानाच्या बांध्या गावाच्या सभोवताल असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात मलेरिया रोगाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी कोरची, एटापल्ली, धानोरा या तालुक्यांमध्ये मलेरियाचा उद्रेक झाला होता. जानेवारी ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत सुमारे ७ नागरिकांचा बळी गेला होता. आरोग्य विभागाने जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील ५ लाख ८ हजार ९६७ नागरिकांचे रक्त नमूने घेतले होते. त्यापैकी २० हजार १३५ नमूने पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. २०१५ मधील सप्टेंबर महिन्यात ८८ हजार ४८४ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ३७८ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह आढळून आले होते. मागील वर्षी मलेरिया रोगाचा बसलेला फटका लक्षात घेऊन आरोग्य विभाग या वर्षी जागृत झाला होता. मागील वर्षी प्रमाणे मलेरियाचा उद्रेक होऊ नये, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा पावसाळ्यापूर्वीच कामाला लागली. आवश्यक त्या पूर्व उपाययोजना सुद्धा या यंत्रणेच्या मार्फतीने करण्यात आल्या. जानेवारी ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत सुमारे ७ लाख ४ हजार ९३७ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी केवळ ६ हजार ६१७ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तर या कालावधीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०१६ या एका महिन्यात ९४ हजार ३६ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. त्यापैकी ३२९ नागरिकांचे रक्त नमूने पॉझिटीव्ह आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत मलेरियाग्रस्त नागरिकांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणे मलेरिया रोगावर नियंत्रण मिळविण्यास गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही. मलेरिया रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत नागरिक स्वत:हून मलेरियापासून बचावासाठी उपाययोजना करणार नाही, तोपर्यंत आरोग्य विभागाचे प्रयत्न थिटे पडणार आहेत. (नगर प्रतिनिधी)मागील वर्षीच्या तुलनेत रक्त नमुने वाढलेजानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील ५ लाख ८ हजार नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले होते. २०१६ मध्ये मात्र ७ लाख ४ हजार ९३७ नागरिकांचे रक्त नमूने घेण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत नमून्यांची संख्या अधिक असली तरी त्या तुलनेत मलेरिया पॉझिटीव्ह आढळणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून येते. रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या पावसाळ्यात मलेरियाने ग्रस्त रुग्णांची संख्या सुद्धा कमी आढळून आली. दरवर्षी मलेरियाचा होणारा उद्रेक लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ लावून सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यात आला. मलेरियाचे त्वरित निदान करून उपचार करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाला. त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेचे कार्य व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरियाग्रस्त रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे.- शिवशंकर पांडे, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली