शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

तेंदूची लिलाव प्रक्रिया पारदर्शक करा

By admin | Updated: March 9, 2017 01:48 IST

पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार

मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन : स्वबळावर तेंदू संकलन करणाऱ्या ग्रामसभांचे होणार प्रबोधन गडचिरोली : पेसा कायद्याअंतर्गत पेसा क्षेत्रात तेंदू व बांबूसह सर्वच गौण वनोपजांचे संकलन, विक्री व व्यवस्थापन करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहे. सन २०१७ च्या तेंदू हंगामात ९८१ ग्रामसभांनी स्वबळावर तेंदू संकलन व व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांनी आर्थिक शोषण टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्गदर्शनात निविदा व लिलाव प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, असे आवाहन गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षात तेंदूपाने हंगामात तेंदू पानाचे उत्पादन कमी झाल्यामुळे बिडी व्यावसायिकांपुढे तेंदूपानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा तेंदूपानाला सर्वोत्तम भाव आहे. त्यामुळे अत्यंत कमी दर्जाचे बिगर पेसा क्षेत्रातील तेंदूपान घटकांचे तीन ते पाच पट किंमतीत विक्री झाली आहे. यावर्षी चांगला भाव असल्यामुळे काही तेंदू खरेदीदार ग्रामसभांना परस्पर संपर्क करून कमी भावात तेंदूपाने खरेदीचा व्यवहार करीत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून आले आहे. मागील वर्षात ग्रामसभांना तेंदू, बांबू विक्रीची व मजुरीची रक्कम पूर्णपणे मिळाली नसल्याने ग्रामसभांची ठेकेदारांनी फसवणूक केल्याची बाब चर्चेत आहे. ग्रामसभांची फसवणूक होत असल्याचे दिसून आल्याने वन विभाग व जिल्हा प्रशासनाने गंभीर चिंता व्यक्त केली असून यावर उपाययोजना म्हणून ग्रामसभांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामसभांनी तेंदू लिलाव व निविदा प्रक्रियेसाठी वृत्तपत्र व इतर माध्यमातून भरपूर प्रसिद्धी दिल्यास जास्तीत जास्त खरेदीदार सहभागी होऊन तेंदूपानाला भरघोस किंमत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. अशी राबवा तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया ग्रामसभांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण वनोपजाची विक्री पारदर्शक लिलाव प्रक्रियेतून करावी, ग्रामसभांनी त्यांच्या क्षेत्रात गोळा होणारे तेंदूपाने अंदाजीत (प्रमाण गोणी) ची संख्या नमूद करून प्रमुख दोन ते तीन वृत्तपत्र लिलाव निविदाबाबत जाहिरात करावी, उघडण्याचा कालावधी दहा ते पंधरा दिवसांच्या अवधीचा ठेवावा, जाहिरातीमध्ये थोडक्यात विक्री, अटी व शर्ती नमूद कराव्या, पुरेसे खरेदीदार हजर झाल्यावरच प्रत्यक्ष जाहीर लिलाव प्रक्रिया करावी, मोजके दोन ते तीन खरेदीदार असल्यास लिलाव प्रक्रिया रद्द करून फेरलिलाव प्रक्रिया दुसऱ्यांदा घ्यावी, एका तालुक्यातील लिलाव प्रक्रियेचे काम तालुक्यातील सर्व गावांनी एकाच ठिकाणी व एकाच ठराविक दिवशी करावी.