शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आधुनिक संप्रेषण साधनांच्या वापरामुळे पत्रपेट्यांचा विसर

By admin | Updated: May 25, 2014 23:33 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाने अनेक क्षेत्रात बर्‍या प्रमाणात प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळात संप्रेषणाचे साधन म्हणून चिठ्ठया, पत्रे यासह अनेक प्रकारच्या साधनांचा वापर मानव करीत होता.

विसोरा : आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाने अनेक क्षेत्रात बर्‍या प्रमाणात प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळात संप्रेषणाचे साधन म्हणून चिठ्ठया, पत्रे यासह अनेक प्रकारच्या साधनांचा वापर मानव करीत होता. पत्र पाठविण्याची पध्दत मागील दहा वर्षापर्यंत जोरात होती. परंतु सध्या काळात आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर वाढल्याने पत्र पाठविणे तर बंदच झाले आहे. शिवाय अनेक गावातील पत्रपेट्या अडगळीत पडल्या आहेत.

जगात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे एका क्षणात लाखो किमी अंतरावरील व्यक्तीशी थेट संपर्क साधता येतो. त्यामुळे मानव मोबाईलच्या प्रेमात अधिकच पडला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील पत्रपेटीची ही अवस्था अतिशय दयनीय आहे. पत्रपेटी भिंतीवर अडकवून तशीच टांगून ठेवलेली आहे. क्वचितच नागरिक पेटीत पत्र टाकतांना आढळून येतात. तालुक्यातील कुरूड येथील एका घराच्या भिंतीवर पत्रपेटी अडकवून ठेवली आहे. परंतु जणूकाही पत्रपेटी अडगळीत फे कल्याच्या अवस्थेत आहे. सध्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अप ई-मेल आदी वेगवान संप्रेषण साधनांचा वापर सर्वाधिक वाढला आहे. तरूण वर्गही नवनवीन संप्रेषण साधनांच्या वापराकडे जलदगतीने वळत असल्याने पारंपरीक संप्रेषण साधनांची अवस्था इतिहास जमा होण्याइतपत झाली आहे. पोष्टाच्या ठिकाणी असलेल्या पत्रपेट्या याच अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी असलेल्या पत्रपेट्या गंजलेल्या अवस्थेत असल्याने नवीन पत्रपेट्या लावण्यांसंदर्भात पोष्ट विभाग उदासिन असल्याचे दिसून येत आहे. एकूणच पारंपरीक संप्रेषणाचे साधन म्हणून ओळखले जाणारे पत्र आज कमी वापर होत असल्याने विसर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)