शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला चोरांचा शॉक

By admin | Updated: August 10, 2014 23:00 IST

महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे.

गडचिरोली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या प्रमाणेच वीज हीसुद्धा आवश्यक गरज बनली आहे. घरातील बहुतांश साधणे विजेवरच चालत असल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापर्यंत वीज पोहोचली असली तरी गडचिरोली जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांपर्यंत अजूनही वीज पुरवठा झाला नाही. आजही शेकडो गावे अंधारातच आहेत.नक्षल्यांची भीती व गावापर्यंत पोहोचण्यास रस्ता नाही. हे कारण पुढे करीत महावितरणचे बहुतांश कर्मचारी ग्रामीण भागात प्रत्यक्ष जात नाही. पावसाळ्याचे चार महिने तर महावितरणचे कर्मचारी गावाचा उंबरठाही झिजवित नाही. याचा फायदा स्थानिक नागरिकांकडून घेण्यात येते. बहुतांश गावामध्ये सायंकाळच्या सुमारास पथदिव्यांवरील तारावर आखोडा टाकून विजेची चोरी केली जाते. त्यानंतर सकाळीच आखोडा काढून जात असल्याने वीज चोरीचा पत्ताच लागत नाही. अशा पद्धतीने ग्रामीण व दुर्गम भागात विजेची खुलेआम चोरी केली जात आहे. महावितरणचे कर्मचारी गावाला भेट देत नाही. हे पक्के ठाऊक असल्याने दिवसेंदिवस विजेच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसंख्येनुसार व विद्युतजोडणीच्या संख्येनुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे सूत्र राज्याच्या इतर भागात योग्य असले तरी या सूत्राची गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे चुकीचे आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या विरळ आहे. एका गावामध्ये केवळ १० ते १५ च्या संख्येत विद्युत जोडण्या दिसून येतात. महावितरणच्या या चुकीच्या नियमामुळे एका कर्मचाऱ्याकडे ३० ते ४० किमी अंतराच्या गावांमधील काम सोपविले जाते. जवळपास ४० ते ५० गावांचा कारभार त्याला बघावा लागतो. हे सर्व करतांना महावितरणच्या कर्मचाऱ्याचे दमछाक उडते ही वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होण्याचे महत्वाचे कारण आहे. वीज चोरी व वीज गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने महावितरण कंपनीला तोट्याचा सामना करावा लागतो. हा तोटा वीजबिल वाढवून इतर ग्राहकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कामाला लावावे व कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी अधिकचे कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, कोरची, धानोरा, एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वीज चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)